"विकिपीडिया:मोबाईल साहाय्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विभव सरिता जीवन कुलकर्णी (चर्चा)यांची आवृत्ती 1581147 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
 
* [https://mr.m.wikipedia.org/wiki/ भ्रमणध्वनी (मोबाईल) दृष्याकडे]
* [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&mobileaction=toggle_view_desktop डेस्कटॉप दृष्य]हेडफोन पासून दूर रहा
 
कानात हेड फोन लावून रुळावरुन जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला निजामुद्दीन - यशवंतपूर एक्सप्रेसने उडविले आणि त्यात त्याचा करुण अंत झाला असल्याची बातमी वाचण्यात आले. मोबाईलच्या हेडफोन मुळे त्या युवकाचा मृत्यू झाला. वास्तविक पाहता रेल्वेचा आवाज किती मोठा असतो तरी ही त्याला ऐकू आले नाही कारण त्याचे सर्व लक्ष त्या मोबाईल वर चालत असलेल्या गाण्यावर असल्यामुळे हा प्रकार घडला. गाणे ऐकल्यामुळे शारीरिक थकवा दूर होते आणि मानसिक आधार मिळतो म्हणून आपण निवांत क्षणी गाणे ऐकत असतो. फार पूर्वी गाणे ऐकन्यासाठी टेपरिकॉर्डर सारख्या साधनाचा वापर केला जात होता. त्या पूर्वीचा जर विचार केलो तर रेडियो हे सुद्धा एक साधन होते गाणे ऐकण्यासाठी. आकाशवाणीवरील कार्यक्रम लोक मोठ्या उत्साहाने ऐकत असत. सकाळी पहाटेच्या भक्तिगीतापासून दिवसाची सुरुवात व्हायची ती शेवटचे सदाबहार गाणे ऐकल्यावर रेडियो बंद व्हायचा. रेडियोवरील बातम्या सुध्दा मन लावून ऐकले जायचे. काही मंडळी खास करून बातमी ऐकण्यासाठी रेडियो ज्यांच्या घरी असेल त्यांच्या घरी जायचे. कारण तेंव्हा वर्तमानपत्र सुद्धा वाचण्यास मिळत नव्हते. चालू घडामोडी समजून घेण्यासाठी रेडियो एकच माध्यम होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा रेडियोला अच्छे दिन आले आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पूर्वी घरात रेडियो असणे श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. कानाला रेडियो लावून क्रिकेट समालोचन ऐकण्याची मजा काही औरच होती. रेडियो सिलोन आणि विविधभारती स्टेशन फार मोठ्या प्रमाणावर ऐकले जायचे. रेडियोचे श्रोते आपले आवडीचे गाणे ऐकण्यासाठी पोस्टातील पत्रव्यवहार करायचे. काळ बदलला आणि रेडियोची जागा टीवी ने घेतली तसे हळूहळू बदल दिसू लागले.
प्रत्येकांच्या घरात टीवी ने कोपऱ्याची जागा मिळविली त्यातल्या त्यात रंगीन टीवी मुळे तर लोक अजुन याकडे आकर्षित झाले. तंत्रज्ञानच्या प्रगतीमुळे पाहता पाहता अनेक शोध लागू लागले. 10 -12 वर्षापूर्वी फक्त श्रीमंत लोकांकड़े असलेले मोबाईल आज प्रत्येकांच्या खिशात खणखणु लागले. माणसाच्या आयुष्यात जसे ही या मोबाईलचा समावेश झाला तसे अनेक गोष्टी काळाच्या पडद्याआड झाले. विशेष करून रेडियो, टेप रिकॉर्डर हे अडगळीत पडले आणि आत्ता मोबाईल वर सर्व काही मिळू लागले.
मोबाईल ही आज जीवनावश्यक बाब बनली आहे. क्षणभर सुध्दा त्याशिवाय जीवन जगणे अशक्य बनले आहे. या छोटाश्या मोबाईल मध्ये माणसाच्या करमणुकीसाठी हवी असलेली प्रत्येक बाब समाविष्ट केलेली आहे, जसे की यात गाणे ऐकता आणि पाहता येण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात एखादा गेम सुध्दा खेळत येऊ शकतो. व्हाट्सएप्प, फेसबुक किंवा ट्विटर सारख्या सोशल मीडिया मुळे लोकांच्या हातात सदानकदा मोबाईल विराजमान झाले आहेत.
मोबाईलचा वापर जेवढा चांगल्या कामासाठी करता येतो अणि तेवढा वाईटसाठी पण. सध्या कानाला हेड फोन लावून गाणे ऐकण्याची वाईट सवय लोकांना लागली आहे. गाणे ऐकन्यात धन्य मानले जात आहे. ज्यामुळे बरेच जीव गमवावे लागले. रस्त्यावर गाडी चालवित असताना ही कानाला हेड फोन लावून गाणे ऐकण्याच्या प्रकारामुळे अनेक रस्ते अपघात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशात एक स्कुल बस चालक कानाला हेड फोन लावून गाणे ऐकत रेल्वे क्रॉस करताना अपघात झाला ज्यात अनेक चिमुकल्या जीवाना आपले प्राण गमवावे लागले. आज काल तरुण पिढी कानाला हेड फोन लावून गाणे ऐकण्यात स्वतः ला धन्य समजतात. रेल्वेने प्रवास करीत असताना ही कानसेन मंडळी कानात हेडफोन लावून दारावर लोंबकळत असतात. तोल सुटल्यामुळे किंवा अन्य कारणाने काही कळण्याच्या आत दुर्दैवी घटना घडते आणि विनाकारण त्याचा जीव जातो. जाणाऱ्याचा जीव जातो मात्र त्याच्या मागे राहणारे लोकांना त्याचा काय त्रास सहन करावा लागतो, हे त्यांनाच कळते. ज्यांच्या घरी अशी दुर्घटना झाली असेल, त्यांचे सर्व घर दुःखाच्या डोंगराखाली येतो. त्यामुळे आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असे वागणे केव्हाही चांगले. कानाला हेड फोन लावून मोबाईल वरील गाणे ऐकणे कधी ही चांगले नाही त्यामुळे कानाचा ही त्रास संभावतो. शक्यतो हेडफोनपासून दूर राहिलेले केव्हा ही बरे नाही का ....?
 
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769
 
==या साहाय्य पाना विषयी==