"संगीत रत्नाकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) लेखात आवश्यक सुधारणा केली. |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) लेखात आवश्यक सुधारणा केली. |
||
ओळ १:
हा भारतात तेराव्या शतकात रचलेला संगीतशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[देवगिरी]]च्या सिंहणराजाच्या काळात आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ [[शारंगदेव]]—अथवा निःशङ्क शार्ङ्गदेव—यांनी १३व्या शतकात रचला. हा ग्रंथ आजही [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीताचा]] प्राण समजला जातो. याचे लेखन [[इ.स. १२१०]] पासून [[इ.स. १२४७]] पर्यंत म्हणजे ३७ वर्षे चालू असावे असे मानले जाते.
==स्वरूप==
संगीत रत्नाकरात शारंगदेवाने संगीताच्या सिद्धान्तांचे इतके सक्षम, स्पष्ट आणि प्रामाणिक विवेचन केले आहे.या ग्रंथात शारंगदेवाने संगीताच्या अत्यंत व्यापक आणि विशाल क्षेत्राचा परिचय करून दिला आहे. त्यासाठी त्याने त्याच्या काळात आणि त्याच्याही अगोदर होऊन गेलेल्या सुमारे ४० पूर्वाचार्यांच्या मतांचे सार काढले आहे. या चार-खंडी ग्रंथात एकूण सात प्रकरणे आहेत. संगीतावर लिहिल्या गेलेला संस्कृतमधील ग्रंथांपैकी हा सर्वात मोठा ग्रंथ आहे असे मानले जाते. या ग्रंथावर सर्वात जास्त टीका लिहिल्या गेल्या आहेत,तसेच
जगांतल्या अनेक भाषांत संगीत रत्नाकरचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.{{संदर्भ हवा}}
|