'''राम''' किंवा '''श्रीराम''' हे वाल्मीकीनेवाल्मीकिंंनी रचलेल्या ’रामायण’या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता. ह्या दिवशी १० जानेवारी इ.स.पू. ५११४ ही [[रामायणाचा काळ|तारीख]] होती, असे दिल्लीच्यामानले इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेतील संशोधकांचे संशोधन सांगतेजाते. जन्मवेळ दुपारी १२ ते १ च्या दरम्यान असावी. (ही तारीख अनेकांना मान्य नाही. जानेवारीमध्ये चैत्र महिना नसतो.) यापूर्वी [[प.वि. वर्तक]] यांनी रामायणातील ग्रह-नक्षत्र स्थितीनुसार, ४ डिसेंबर इ.स.पू. ७३२३ ही तारीख काढली होती. [डिसेंबरमध्येही चैत्र नसतो]