"बाजी प्रभू देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎घोडखिंडीचा लढा: दुवे जोडले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
ओळ ७:
 
== घोडखिंडीचा लढा ==
{{mainमुख्य articleलेख | पावनखिंडीतील लढाई}}
 
सिद्दी जौहरने [[पन्हाळ्यालापन्हाळा | पन्हाळापन्हाळ्याला]] घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी [[विशाळगडाकडेविशाळगड | विशाळगडविशाळगडाकडे]] निघाले होते.बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल<ref>बांदल घराण्याची तक्रीर (राजा शिवछत्रपति - गजानन भा. मेहेंदळे)</ref>,फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते<ref>जेधे शकावली</ref>. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड [[कोल्हापूर जिल्ह्यातजिल्हा | कोल्हापूर जिल्हाजिल्ह्यात]] आहे.
 
सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले.