"सी.एन. अण्णादुराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1969|2|3|1909|9|15}}
| मृत्युस्थान = [[चेन्नई]]
| पक्ष = [[द्रविड मुन्नेत्र कळघम|द्रविड मुण्णेट्र कळगम्]]
| सही =
}}
'''सी.एन्. अण्णादुरै''' तथा '''कांजीवरं नटराजन् अण्णादुरै/कांजीवरम् नटराजण् अण्णादुरै''', लोकप्रिय नाव: अण्णा ([[तमिळ भाषा|तमिळ्]]: கா. ந. அண்ணாதுரை; १५ सप्टेंबर १९०९ - ३ फेब्रुवारी १९६९) हे [[भारत]]ाच्या [[तमिळनाडू]] राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे [[मुख्यमंत्री]] होते. [[तमिळ भाषा|तमिळ् भाषेतील]] एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा [[पेरियार]] ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियारच्या ''द्रविडर कळघम्'' ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये झपाट्याने प्रगती करताना अण्णादुराई व पेरियार ह्यांमधील मतभेद वाढीस लागले. १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य पेरियारच्या मते द्रविड लोकांसाठी वाईट बातमी होती परंतु अण्णादुराई ह्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले.
 
अखेर १९४९ साली अण्णादुराईंनी आपल्या [[द्रविड मुन्नेत्र कळघम|द्रविड मुण्णेट्र कळगम्]] ह्य नव्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने ब्राह्मणविरोधी धोरणे व [[हिंदी भाषा|हिंदी भाषेचा]] तिटकारा असलेल्या अण्णादुराईंनी १९५३ साली स्वतंत्र तमिळनाडूची मागणी करण्याचे ठरवले होते परंतु १९५६ सालच्या राजकीय पुनर्रचनेदरम्यान [[मद्रास राज्य]]ामध्ये केवळ तमिळ भाषिक जिल्हेच राहिले व स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी मागे पडली. वाढत्या लोकप्रियतेमुळे १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षाच्या आघाडीने २३७ पैकी १७९ जागांवर विजय मिळवून दणदणीत बहुमत मिळवले व [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाची येथील सत्ता संपुष्टात आणली.
 
मुख्यमंत्रीपदावर केवळ २ वर्षे राहिल्यानंतर १९६९ साली [[कर्करोग]]ामुळे अण्णादुराईंचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या सुमारे १.५ कोटी लोकांच्या गर्दीची नोंद [[गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स]]मध्ये करण्यात आली होती. चेन्नईमधील [[मरीना बीच]] येथे त्यांचे स्मारक असून शहरामधील ''अण्णा सलाई'' हा सर्वात वर्दळीच्या रस्त्याला, ''अण्णा नगर'' ह्या भागाला, [[अण्णा विद्यापीठ]] ह्यांना त्यांचेच नाव देण्यात आले आहे. अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये फूट पडून [[एम.जी. रामचंद्रन]]ने स्थापन केलेल्या [[अण्णा द्रमुक]] पक्षाला देखील त्यांचेच नाव दिले गेले आहे.