"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''आर्य चाणक्य''' ऊर्फ '''विष्णुगुप्त''' ऊर्फ '''कौटिल्य''' (कालमान: अंदाजे [[इ.स.पू. ३५०]]च्या सुमारास) हा [[सम्राट चंद्रगुप्त मौर्य|सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या]] राजसभेत महामंत्री होता. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्यांंचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला [[कौटिलीय अर्थशास्त्र]] हा ग्रंथ [[भारतीय संस्कृती]]तील एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ [[अर्थशास्त्र]] व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या नीतीस 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. [[कौटिलीय अर्थशास्त्र]] हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या लेखनाचा परिणाम त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथांवर झालेला आढळतो. उदाहरणार्थ, [[योगेश्वर याज्ञवल्क्य|योगेश्वर याज्ञवल्क्याने]] लिहिलेली [[याज्ञवल्क्य स्मृती]] व [[वात्सायन|वात्सायनाने]] लिहिलेले [[कामसूत्र]], हे ग्रंथ. [[पंचतंत्र]] या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्तादेखील ''ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि'' या श्लोकातून अर्थशास्त्राचे महत्त्व मान्य करतो.
 
== सुरुवातीचेप्रारंंभिक आयुष्य ==
चाणक्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सर्वांत प्रचलित कथेनुसार चाणक्य अथवा विष्णुगुप्त हा [[पाटलीपुत्र]]मधील 'चणक' या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाबद्दल चणक यांना अटक केली व त्यांचा कारावासात म्रुत्यू झाला. पाटलीपुत्र शहरात नंद राजवटीत चणक परिवाराचे जगणे असह्य झाल्याने विष्णुगुप्तने [[तक्षशिला|तक्षशिलेला]] प्रयाण केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर विष्णुगुप्ताने तक्षशिला विद्यापीठातच राजनीती व [[अर्थशास्त्र]] या विषयांवर अध्यापन सुरू केले व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून विष्णुगुप्तने आपली ओळख निर्माण केली. राजनीती व अर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या हाताखाली तयार झाले त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडीत नसूनही चाणक्याचे नाव भारताच्या राजकीय वर्तुळात आदराने घेतले जाई. [[कैकेय]] देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्याचा मित्र होता, असे मानतात. लहानपणापासूनच नंद राजवट उलथून टाकण्याचे स्वप्न विष्णुगुप्ताने मनात बाळगले होते. त्यादृष्टीने तयारी म्हणून त्याने आपले शिष्य तयार केले होते, त्यांत [[चंद्रगुप्त मौर्य]] हाही होता.त्याला चाणक्याने माघाधाचा राजा केले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले