"दुसरे बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
मराठी राज्य कसे बुडाले याविषयी रियासतकार सरदेसाई यांनी केलेली चर्चा. खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन nowiki ? |
||
ओळ ४:
==जन्म आणि बालपण==
बाजीराव हा [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव]] आणि [[आनंदीबाई भट|आनंदीबाई]] यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्यांना जसे लष्करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्यांचे व्यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्याचे शिक्षण मुख्यतः फक्त भिक्षुकी शिक्षण झाले.<ref name=":0">सरदेसाईकृत मराठी रिसायत </ref>
==पेशवेपद==
सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव याचा पेशव्यांच्या गादीवर हक्क होता. पण असे झाले तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल अशी भीती नाना फडणवीसांना होती. त्यामुळे त्यांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. त्यासाठी त्यांनी सवाई माधवरावांच्या पत्नीस चिमणाजी याला दत्तक घ्यावयाचे सांगितले. सन १७९६ ला चिमणाजी पेशवेपदावर आले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली.
१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. दुस-या बाजीरावास राज्यकारभार चालविण्याचे शिक्षण मिळालेले नव्हते. त्याने सत्तेचा दुरुपयोग करुन प्रजेच्या संपत्तीचा अपहार करणे सुरु केले. त्याच्या अंमलामध्ये प्रजेला आपल्या मालमत्तेची व जीविताची खात्री वाटेनाशी झाली. सत्तेमध्ये सर्वत्र लबाडांचा उदोउदो सुरु झाला. पेशवेपदी आल्यावर दुस-या बाजीरावाने आपले वर्तन उदार ठेविले नाही. सत्ताधीशाने सूड उगवावयाचा नसतो, प्रजेचे पालन करावयाचे असते, मात्र दुस-या बाजीरावाने सत्तेचा दुरुपयोग करुन आपल्या वडिलांच्या विरोधातील राजकारणी लोकांना भयभीत केले. त्यामुळे पिढ्यानपिढ्या मराठी सत्तेच्या कल्याणासाठी प्राणपणाने झटणारे सत्तेचे चाकर दुस-या बाजीरावाच्या काळात झपाट्याने राज्यकारभारामधून बाजूला झाले. एका बाजूला सत्तापदावर बसलेला दुसरा बाजीराव व त्याला साथ होती दौलतराव शिंदे याची या दोघा अपरिपक्व तरुणांनी बेबंद कारभार करून प्रजेला सळो की पळो करुन सोडले.
इ.स. १८०० च्या सुमारास पेशवे विरुद्ध होळकर, होळकर विरुद्ध शिंदे (सिंदिया) अशा लढाया जुंपल्या. मोठमोठे सरदार आपल्याच मुलखात लुटालूट करत सुटले. यामध्ये यशवंतराव होळकराचा वडील भाऊ विठोजी देखील होता. दुस-या बाजीरावाने त्याला पकडून अतिशय क्रूरपणे हत्तीच्या पायाशी बांधून ठार मारिला. त्यामुळे यशवंतराव होळकराने इंदूरवरून पुण्यावर चाल केली. त्याला आपण काय करतो आहोत हे कळत होते त्यामुळे त्याने शक्य तेवढे सबुरीने घ्यायचे धोरण ठेवले. त्याने दुस-या बाजीरावाकडे समेट करण्यासाठी माणसे पाठविली. मात्र त्या माणसांना देखील दुस-या बाजीरावाने कैद केले. यामध्ये मोरोबादादा, समस्त फडके मंडळी, गोपाळवराव मुनशी हे लोक होते. त्यांच्यापैकी कित्येकांस कैद होऊन त्यांची रवानगी अवघड किल्ल्यांवर झाली. सरतेशेवअी यशवंतराव होळकराने पुण्यावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्याशी सामना देणे दुस-या बाजीरावाला शक्य झाले नाही. तो वसई येथे इंग्रजांच्या आश्रयाला गेला. त्यावेळी जगाच्या राजकारणात वरचष्मा राखून असलेले इंग्लिश लोक ही दैवदुर्लभ संधी कशी सोडतील? त्यांनी दुस-या बाजीरावाकडून वसई येथे तह करून घेतला. याच तहामुळे पुढील काही पिढ्यांचे पारतंत्र्य निश्चित झाले.
२ मे १८०२ ला बाजीरावांचाच भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला.
डिसेंबर १८०२ ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले.
Line २४ ⟶ २८:
इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी [[कानपूर]]जवळील [[बिठूर|ब्रह्मावर्तास]] केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला.
मराठ्यांच्या सत्तेचा अस्त का झाला याविषयी रियासतकार सरदेसाईंनी विस्तृत विवेचन केले आहे, ते पुढीलप्रमाणे -
<nowiki>''</nowiki>एक पक्ष म्हणतो की इंग्रजांकडे उत्तम प्रतीची शस्त्रास्त्रे व कवायती युद्धपद्धती असल्यामुळे इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. तर दुसरा पक्ष म्हणतो की इंग्रजांमध्ये एकता असल्याने इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. मात्र तसे पाहू गेले तर महादजी शिंद्यांनी (सिंदिया) अलिगढ येथे फ्रेंचांच्या मदतीने अत्याधुनिक शस्त्रांचा कारखाना काढला होता. तसेच फ्रेंच सेनापतींच्या मदतीने कवायती फौज देखील उभी केली होती. मात्र मराठ्यांच्या पक्षामध्ये सर्वांना सावरुन घेणारा, सांभाळून घेणारा, पुढे नेणारा कोणी नेता नव्हता त्यामुळे मराठ्यांच्या पक्षाचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांकडे एकाहून एक धुरंधर सेनानी, मुत्सद्दी व राजकारणी होते ते सर्व एकत्र विचार करून चर्चा करून राजकारणाचे धोरण काय ठरवावयाचे याचा निर्णय घेत. हे सर्व इंग्लिश लोक अनेक वर्ष राजकारणात, सैनिकी सेवेत अनुभव मिळविलेले होते. इंग्रजांकडे एका फळीतील मुत्सद्दी निवृत्त झाल्यावर त्याची जागा पुढे चालविण्यासाठी यथायोग्य उमेदवार निवडून त्याला पारंगत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात. याउलट मराठ्यांच्या पक्षाकडे असे काही धोरण नव्हते. केवळ वंशपरंपरा चाललेल्या सरदारक्या व दरबारी पदे अयोग्य व्यक्तींच्या हातात आली. खरेतर राष्ट्रहिताला प्राध्यान्य देऊन, सवाई माधवरावाच्या आत्महत्येनंतर सर्व सरदारांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून राष्ट्राच्या प्रगतीची दिशा ठरवावयास पाहिजे होती. मात्र आपसातील फाटाफुटीमुळे हे सर्व झाले नाही.
<ref name=":0" />शिवकालात जसे चारित्र्यसंवर्धन झाले व सर्वसामान्य माणसाचा देखील राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात उपयोग झाला ते चारित्र्य अगदीच रसातळास गेले. प्रमुख राजकारणी मंडळी देखील यातून सुटली नाहीत. वाणीची सत्यता राहिली नाही. शब्दावर विश्वास राहिला नाही. थोडक्यात म्हणजे राज्य चालविण्याइतकी तपश्चर्या राजकारणी लोकांची राहिली नाही व स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्यता सर्वसामान्यांची राहिली नाही तेव्हा स्वातंत्र्य गेले.<nowiki>''</nowiki>
==संदर्भ==
|