"स्वरानंद प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ६:
 
==इतिहास==
स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७० रोजी स्थापन झाली आणि १९९५ साली तिचे नाव स्वरानंद प्रतिष्ठान झाले. इ.स. १९७०च्या सुमारास पुण्यातील विश्वनाथ ओक व हरीश देसाई यांनी 'आपली आवड' या शीर्षकाखाली प्रथमच मराठी वाद्यवृन्दाचा कार्यक्रम केला. त्याला त्या काळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचाबरोबर अरुण नूलकर , सुधीर दातार, [[अजित सोमण]], सुहास तांबे, सुरेश करंदीकर, प्रकाश भोंडे या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होतच गेले. त्यातूनच स्वरानंद ही संस्था स्थापन झाली. केवळ मराठी सुगम संगीताचे रंगमंचीय कार्यक्रम करणारी ''''स्वरानंद प्रतिष्ठान'''' ही तसे करणारी आद्य संस्था म्हणून ओळखली जाते.
 
==स्वरानंदचे कार्यक्रम==
'स्वरानंद' नेहमीच रसिकश्रोता हा केंद्रबिंदू मानत आली आहे व कार्यक्रमांची आखणी व बांधणी केली आहे. २॥ अडीच-तीन तास रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय भावगीते, चित्रगीते, अभंग, लावणी, नाट्यगीते, कोळीगीते, लोकसंगीत आदी गानप्रकारांची गाणी स्वरानंदाच्या कार्यक्रमांत सादर होतात.
 
==संस्था स्थापनेचा उद्देश==