'''रामोशी''' हाही रामवंशीमहाराष्ट्र, यामध्य शब्दाचा अपभ्रंश असल्याचे मानण्यात येते. रामोशी ही महाराष्ट्रातीलप्रदेशातील एक लढवय्यी क्षत्रिय जमातजात आहे. छत्रपती [[शिवाजी महाराजांच्यामहाराज]]ांच्या राजवटीत अनेक गड किल्ल्यांची जबाबदारी या जमातीकडेसमाजाकडे होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेच्या यशाचा मानकरी [[बहिर्जी नाईक]] या जमातीतीलजातीतील होता. विश्वासू, प्रामाणिक आणि शूर म्हणून या जमातीची इतिहासात नोंद आढळते. उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम या जमातीनेच इंग्रज राजवटीविरुद्ध बंड केल्याची नोंद आहे. भारतात फाशी दिले गेलेले उमाजी नाईक हे आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. ही जमात कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात बेरड अथवा बेडर, तलवार, नायका किंवा नाईक नावानेही ओळखली जाते. दक्षिणेतील मध्युयगीन काळातील विजयनगर साम्राज्यातील नायका राजा या जमातीतीलच होता. महाराष्ट्रात रामोशी, बेरड अथवा बेडर जमातीचे प्राबल्य प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आढळते.