"बालकुमार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ४६:
* [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यातील बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने पिकुळे (ता. [[दोडामार्ग]]) येथे ७ जानेवारी २०१४ला एक बालकुमार साहित्य संमेलन झाले. हे जिल्हास्तरीय संमेलन होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यकार सुभाष कवडे होते. एक हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, कोकणातील बालसाहित्यिक आदींचा या बालकुमार साहित्य संमेलनात सहभाग होता. संमेलनात काव्यवाचन, बालकुमार कथाकथन, परिसंवाद, सत्कार सोहळा, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आदी उपक्रम झाले. हे संमेलन दर वर्षी होते.
* वसई माणिकपूर येथील सहकार शिक्षण संस्थेच्या विद्यमाने शुक्रवार १४ डिसेंबर रोजी वनमाळी विद्यासंकुलातील जी.जे. वर्तक विद्यालय येथे 'पाचवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले होते. या मराठी साहित्य संमेलनास वसई - विरार शहर महापालिकेने ७५ हजार इतके अनुदान दिले होते.
* [[वसई माणिकपूर]] येथील सहकार शिक्षण संस्था व वसई-विरार शहर पालिकेच्या वतीने सहावे एकदिवसीय बालकुमार मराठी साहित्य संमेलन २० डिसेंबर २०१३ रोजी वसई रोड (पश्चिम) येथील वर्तक विद्यालयात झाले. नगरपालिकेने या संमेलनास एक लाखाचे अनुदान दिले होते. संमेलनात, तालुक्यातील मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील, तसेच जिल्हा परिषद शाळांमधील पालक, विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
* [[लोणावळा]] गावात मनःशक्ती प्रयोग आणि मसाप यांच्यातर्फे २० सप्टेंबर २०१७ रोजी एक तथाकथित पहिले बालकुमार साहित्य संमेलन भरले होते. डॉ. [[अनिल अवचट]] संमेलनाध्यक्ष होते.
* [[मुलांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] नावाचे एक (पहिले) मराठी साहित्य संमेलन २००२ साली भरले होते. डॉ. [[मधुसूदन घाणेकर]] हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
|