"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, समाजसुधारक, आणि [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथाचे]] संस्थापक होते. [[महानुभाव]] धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. [[लीळाचरित्र]] या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत.
सुधारक होत.
 
चक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरवातसुरुवात झाली आहे..
 
==प्रारंभिक जीवन==
चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती [[लीळाचरित्र]]ाच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात [[गुजराथ]]मधील [[भडोच]] येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे [[भडोच]]चा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते.
 
तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.<ref>संकपाळ (२००९) पृ. ८. देवगिरीच्या यादवांनी [[गुजराथ]]वर स्वारी केली असता हरपाळदेव यादवांचा पाठलाग करत वेरूळपर्यंत आले होते. या युद्धात त्यांच्या कपाळावर जखम झाली होती.</ref> पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. [[महानुभाव|महानुभावीयांच्या]] श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील चौथा अवतार श्री [[चांगदेव]] यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.<ref name="page9-10">संकपाळ (२००९) पृ. ९-१० आणि १३. पंचावतारातील चौथा अवतार श्री [[चांगदेव]] यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. अन्य मतांनुसार [[चांगदेव|चांगदेवांचा]] आत्मा मुक्त झाला; हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.</ref> ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली.<ref name="page9-10"/>
 
या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकर्‍यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्‍नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकर्‍यांचे पैसे परत केले.<ref>[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ६</ref> या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला.
Line २० ⟶ १९:
या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची [[मेहकर]] येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना [[देवकी]] व स्वतः [[श्रीकृष्ण]] बनवून त्यांनी [[मेहकर]] येथे [[गोकुळाष्टमी]] साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी [[लोणार]]ची यात्राही केली. नंतर एके दिवशी [[सिंहस्थ]] यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर [[त्र्यंबकेश्वर]]ला जाण्यास निघाले. वाटेत [[पैठण]] येथे त्यांनी [[त्र्यंबकेश्वर]]ास जाण्याचा बेत रद्द करून [[पैठण]] येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.<ref name="sankpal27">संकपाळ (२००९) पृ. २६-२७</ref> अशा तर्‍हेने रिद्धीपुरापासून सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण [[पैठण]] इथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले.
 
एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली.<ref name="sankpal27"/>
 
==संदर्भ व नोंदी==
* महानुभाव पंथ : प्रकाशक - चक्रधर स्वामी सेवा समिती नेरी बु॥
* संकपाळ, बापूजी; ''श्रीचक्रधर'' (२००९); नॅशनल बूकबुक ट्रस्ट, ऑफ इंडिया; आय. एस. बी. एन. ९७८-८१-२३७-२५९०-१
* लीळाचरित्र : एकांक; संपा.संपादक - भालचंद्र सोहोनी (२००४); श्रीप्रसाद प्रकाशन, पुणे
 
{{संदर्भयादी}}
<br />