"लाल बहादूर शास्त्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३६:
 
== जीवन ==
२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली [[वाराणसी]] येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. [[प्राथमिक शिक्षण]] मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणशीलावाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी [[महात्मा गांधी]], [[लोकमान्य टिळक]], [[लाला लजपतराय]] यांच्या जीवनदर्शनाचे तज्ञ्ल्त्;वमहत्त्व त्यांना समजाविले.
 
वयाच्या अकराव्या वर्षी [[बनारस हिंदू विश्वविद्यालय|बनारस हिंदू विश्वविद्यालयाची]] कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. [[चंपारण्य सत्याग्रह]], रौलेट अ‍ॅक्ट, [[जालियनवाला हत्याकांड]] इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, [[आचार्य कृपलानी]], डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.
 
नेहरू, शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविदवल्लभगोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रटरीसेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते [[उत्तर प्रदेश]]चे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजिनामाराजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणुकानिवडणूका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने [[पंतप्रधान]] झाले. [[पाकिस्तान]]ला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. [[युनो]]ने युद्धबंदी केली. [[रशिया]]ने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर [[भारतरत्न]] पुरस्काराने गौरवण्यात आले.
 
== मृत्यूविषयी प्रवाद ==