"जन गण मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक सुधारणा केली.
ओळ ३२:
 
== प्रवाद ==
बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी [[रवींद्रनाथ टागोर]] (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी २६ डिसेंबर रोजी गीत लिहिले ते ‘जन गण मन.’ २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वत: चाल लावणारे ‘जन गण मन’ काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गुंजले. या गीतात भारत देश किती सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे. घटना समितीने २४ जानेवारी १९५0 मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून ती म्हणण्यास वेळ लागतो, यामुळे केवळ पहिलेच कडवे संबंध भारतात म्हटले जाते. पाचही कडव्यांच्या राष्ट्रगीताचे संकलन भारतीय संस्कृतिकोश खंड-८ यामध्ये प्रामुख्याने आढळते. रवींद्रनाथ टागोर यांचे निधन ७ ऑगस्ट १९४१ ला झाले. त्यापूर्वी त्यांनी ‘मी भारतात पुन:पुन्हा जन्म घेईन. भारतात कितीही दु:ख, दारिद्रय, दैन्य असले तरीही माझे भारतावर अत्यंत प्रेम आहे. यावरूनच त्यांच्या राष्ट्रभक्तीचे उत्कट दर्शन होते. हा संदर्भ मुलांचा सांस्कृतिक कोश खंड-२ मध्ये आढळतो.
 
== 'पूलीन बिहारी सेन' यांना टागोरांनी लिहीलेल्या पत्राचे स्वैर भाषांतर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जन_गण_मन" पासून हुडकले