"जालना जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
BHARAT USARE (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ३०:
जालना जिल्हा ७,६१२ चौ. कि.मी. क्षेत्राने व्यापलेला आहे, जे राज्याच्या एकूण क्षेत्राच्या तुलनेत २.४७ % एवढा आहे, तर लोकसंख्या १९,५९,०४६ एवढी आहे. जालना जिल्ह्याचे मुख्यालय जालना असून राज्याच्या व देशाच्या [[राजधानी]]ंशी ब्रॉडगेज रेल्वे लाईनने जोडलेले आहे. तसेच राज्यातील मुख्य शहरे देखील राज्य महामार्गाने जोडलेले आहेत. जिल्हा हा हायब्रीड सीडस् साठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलींग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दाल मील, बि. बीयाने इ. तसेच [[मोसंबी]]साठी देखील राज्यामध्ये जालना जिल्हा प्रसिद्ध आहे.
जालना जिल्ह्यातील जनतेने [[मराठवाडा मुक्ती संग्राम]]ामध्ये महत्वाची भूमीका पार पाडली होती. जनार्धन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे.यांना महत्वाचे स्थान आहे .
हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित
जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मिमी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीवर खरीप पिके निघतात, तर त्यांतली ४०% रब्बी पिकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पिके आहेत.
|