"वाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
'पूर्ण अर्थाचे बोलणे' किंवा 'अर्थपूर्ण' [[शब्द]]समूहाला '''वाक्य''' म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[अक्षर]], [[वर्ण]], [[शब्द]] व [[व्याकरण]]) एक आहे.
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण [[वर्ण]] असे म्हणतो. हे [[ध्वनी]] कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतो. ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे असे म्हणतो. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून '[[बदक]]' हा एक शब्द झाला. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहतो.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पद आणि शब्दात फरक आहे. मराठी भाषेत सहसा शब्द त्यांच्या मूळ स्वरूपात न वापरता बदल करून वापरले जातात. या बदललेल्या स्वरूपांना सामान्य रूप म्हणतात. मराठीतील एक पद हे एक शब्द, त्याचे सामान्यरूप किंवा सामान्य रूपातील शब्दांचा समूह अशा स्वरूपात बनते. वाक्य हे पदांचे बनलेले असते.
|