"तिबेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) लेखात आवश्यक भर घातली. |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) लेखात आवश्यक भर घातली. |
||
ओळ २९:
बहुसंख्य [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मीय]] असलेले तिबेटी लोक [[दलाई लामा]] ह्यांना [[धर्म]][[गुरू]], पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतू १९५९ सालापासून [[१४ वे दलाई लामा]] [[तेंझिन ग्यात्सो]] हे [[धर्मशाळा, हिमाचल प्रदेश]] येथे [[भारत सरकार]]च्या आश्रयास आहेत व ते तेथूनच आपले सरकार चालवतात.
लाई लामा हे तिबेटचे सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरुष आणि धर्मपुरुष . चौदावे दलाई लामा म्हणतात-“ संस्कृती,शिक्षण,धर्म,साहित्य आणि कला अशा सर्वच क्षेत्रात तिबेटला भारतानेच मार्गदर्शन केले. मूलभूत विचाराच्या तत्वज्ञानाचा प्रवाह अखंडितपणे भारतातून तिबेटमध्ये प्रवाहित झाला आणि ज्ञानोत्सुक तिबेटने त्या प्रवाहाचे अंत:करणपूर्वक स्वागत केले.” (डॉ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन पृष्ठ क्रमांक १७५ )
इसवी सन ६२९ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी नरदेव हा तिबेटच्या सिंहासनावर आला.तो महत्वाकांक्षी आणि पराक्रमी होता.त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. नेपाळवर त्याने आक्रमण केले.नेपाळच्या राजाने प्रसंग ओळखून आपली कन्या नरदेवाला दिली.तिने जाताना आपल्याबरोबर बुद्धाची एक मूर्ती नेली आणि तिबेटच्या राजघराण्यात गौतम बुद्धाची उपासना सुरु झाली.चीनच्या राजानेही आपली कन्या नरदेव याला दिली, तिनेही येताना शाक्यमुनी आणि मैत्रेय बुद्ध यांच्या प्रतिमा सोबत आणल्या. या दोन्ही पत्नींच्या निमित्ताने राजा नरदेव याला बौद्ध धर्माचा परिचय झाला. नरदेवाने थोन मि संभोत या बुद्धीमान आचार्याला आपल्या राजवाड्यात पाचारण केले.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Tibet|तिबेट}}
|