"दयानंद सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
==कौटुंबिक माहिती==
दयानंद सरस्वतींचा जन्म काठेवाडातील [[मोरवी]] संस्थानात अंबाशंकर नावाच्या औदिच्य ब्राह्मणाच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. संन्यास घेतल्यावर दयानंद सरस्वती असे नाव यांनी धारण केले.
==ग्रांथिक कार्य==
[[वैदिक धर्म]]ाचा प्रचार करण्यासाठी यांनी १० एप्रिल १८७५, [[मुंबई]] येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदातील तत्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ [[संस्कृत]] व [[हिंदी]] भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाशात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर मतपंथांचे खंडनही यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरीता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून [[सोळा संस्कार|सोळा संस्कारां]]चे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.
==आर्य समाजाचे कार्य==
आर्य समाजाच्या तत्वांचा प्रचार ते प्रथम [[अहमदाबाद]], [[बडोदे]], [[पुणे]], मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर [[दिल्ली]] येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. यांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: [[पंजाब|पंजाबा]]त यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.<ref>चित्राव सिद्धेश्वरशास्त्री,अर्वाचीन चरित्र कोश (१९४६)</ref>
{{संदर्भनोंदी}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:सरस्वती, दयानंद}}
[[वर्ग:समाजसुधारक]]
[[वर्ग:इ.स. १८२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:आर्य समाज]]
[[वर्ग:हिंदू संत]]
|