"महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) →वाहनांचा ताफा (फ्लीट): चित्र टाकले |
No edit summary |
||
ओळ ३६:
वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतूकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारा खासगी व्यावसायिकांद्वारे सुरु झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारतातील ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रांसपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.
बीएसआरटीसीची पहिली बस [[जून १]], [[इ.स. १९४८]] यादिवशी [[पुणे]] ते [[अहमदनगर]] या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या '''महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ''' (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.
==सेवा आणि विस्तार==
|