"हनुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Chetan12414 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ ३१:
}}
'''हनुमान''' [[रामायण|रामायणातील]] एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो [[राम|रामाचा]] महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म [[अंजनी]] या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. तो पवनपुत्र व महाबली होता व त्याला अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून [[इंद्र|इंद्रासहित]] सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले [[वज्र]] हनुमानाच्या दिशेने
पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली व तो रामाचा निस्सीम भक्त बनला. [[रावण|रावणाने]] [[सीता|सीतेचे]] अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून [[लंका]] गाठली आणि रामाचा निरोप सीतेकडे पोचवला. ते वर्ष इ.स.पू. ५०६७ होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे. रावणाच्या सैनिकांनी त्याला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला आग लावली. तेव्हा त्याने आपल्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली आणि परत जाऊन सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने हिमालयात झेप घेतली आणि [[द्रोणागिरी]] पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर
हनुमान हे चिरंजीव आहेत म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत, अशी मान्यता आहे.
मारुतीचा उल्लेख महाभारतात देखील येतो. तो महाभारत युद्धदरम्यान अर्जुनाच्या ध्वजावर बसून होता.
==जन्मतिथी==
* चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी हनुमान जयंती साजरी हॊतॆ.
* हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.
==हेसुद्धा पाहा==
|