"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
 
==एकाकी भटकंतीचा काळ==
[[गोविंदप्रभु|गोविंदप्रभूंपासून]] शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. [[लीळाचरित्र]]ाच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. [[आंध्र प्रदेश]]ाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले.<ref>[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ११ आणि १४</ref> यावेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. त्याकाळात चक्रधारांचे वर्तन काहीसे अवलियाप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी तर ते अंगणातगाईच्या झोपलेल्या एका स्त्रीच्या अंथरुणातगोठ्यात जाऊन झोपले.<ref>लीळाचरित्र, एकांक, लीळा ११</ref> एका प्रसंगी [[वरंगळ]] येथील एका घोड्याच्या व्यापार्‍याने आपल्या मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत संन्यस्त झाले.<ref>लीळाचरित्र, एकांक, लीळा १६</ref> गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी [[वडनेर]]चे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादि शिष्यपरिवार मिळाला.
 
या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची [[मेहकर]] येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना [[देवकी]] व स्वतः [[श्रीकृष्ण]] बनवून त्यांनी [[मेहकर]] येथे [[गोकुळाष्टमी]] साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी [[लोणार]]ची यात्राही केली. नंतर एके दिवशी [[सिंहस्थ]] यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर [[त्र्यंबकेश्वर]]ला जाण्यास निघाले. वाटेत [[पैठण]] येथे त्यांनी [[त्र्यंबकेश्वर]]ास जाण्याचा बेत रद्द करून [[पैठण]] येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.<ref name="sankpal27">संकपाळ (२००९) पृ. २६-२७</ref> अशा तर्‍हेने रिद्धीपुरापासून सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण [[पैठण]] इथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले.