"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Thank you for this information !!!!!!!!!!"" खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
→प्रारंभिक जीवन: आशय जोडला खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ७:
चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती [[लीळाचरित्र]]ाच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात [[गुजराथ]]मधील [[भडोच]] येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे [[भडोच]]चा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते.
तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.<ref>संकपाळ (२००९) पृ. ८. देवगिरीच्या यादवांनी [[गुजराथ]]वर स्वारी केली असता हरपाळदेव यादवांचा पाठलाग करत वेरूळपर्यंत आले होते. या युद्धात त्यांच्या कपाळावर जखम झाली होती.</ref> पुढे हरपाळदेवांना
या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे जुगाराचे व्यसन मात्र तसेच राहिले. एक दिवस द्यूतात हारल्यामुळे त्यांनी देणेकर्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांना देणेकर्यांचे पैसे परत करावे लागले.<ref>[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ६</ref> या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करायचा निर्णय घेतला.
|