"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
}}
 
'''डॉ. {{लेखनाव}}''' ([[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] - हयात) हे भारतीय [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रज्ञ]] व लेखक आहेत.
 
== जीवन ==
नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, [[वाराणसी]] येथील [[बनारस हिंदू विद्यापीठ|बनारस हिंदू विद्यापीठाच्या]] [[गणित]] शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. [[इ.स. १९५७]] साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते [[ब्रिटन|ब्रिटनमधील]] [[केंब्रिज]] येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, [[रँग्लर]] ही पदवी, खगोलशास्त्राचे [[टायसन मेडल]], स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
 
[[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
ओळ ४१:
== संशोधन ==
* [[स्थिर स्थिती सिद्धान्त]]
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
 
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे [[खगोलभौतिकी]] क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला [[खगोलशास्त्र]] समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
 
== साहित्यातील भर ==
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्यानेयांचे विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
 
===विज्ञानकथा पुस्तके===
* अंतराळातील भस्मासुर
* अभयारण्य
* चला जाऊ अवकाश सफरीला
* टाइम मशीनची किमया
* प्रेषित
Line ८० ⟶ ८३:
* २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
* २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
* त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरलाबिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत.
* २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३
* जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
Line ८८ ⟶ ९१:
 
==चरित्र==
डॉ. [[विजया वाड]] यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.
 
==हेही वाचा==