"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी [[आचार्य अत्रे]] यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्‌एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे अग्रलेख. पुस्तक परीक्षणे, मुलाखती आणि वाड्‌मयीन लेख प्रसिद्ध होत असत. त्यांनी आयुष्याची २५ वर्षे वृत्तपत्र व्यवसायात घालवली. त्यामुळे स्फुटलेखनाची त्यांना सवय होती. त्यांनी राजकीय लेखनही केले.
 
शिरीष पै एक चांगल्या वक्त्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही त्यांनी प्रखर भूमिका निभावली. त्या बोलताना निरागसपणे बोलायच्या. मात्र, त्या बोलण्यामध्ये खूप अर्थ असे. त्यांची भाषा प्रगल्भ होती.
 
नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नवयुगच्या माध्यमातून कथा आणि कविता लेखन स्पर्धांचे आयोजन केले. त्यातून अनेक लेखक, कवी, पत्रकार उदयाला आले. त्यांनी ललित लेखकांनाही प्रोत्साहन दिले. वडिलांना न पटलेल्या एका लेखकाकडे पाहण्याचा वडलांचा दृष्टिकोन बदलण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यांची वडिलांवर प्रचंड श्रद्धा, प्रेम आणि त्यांच्याप्रती आदर होता.
 
शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.
 
शिरीष पै या ओशोंच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी 'प्रतिभावंत ध्यानयोगी ओशो' या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांचे एकूण १४ कथासंग्रह असून कांचनगंगा, खडकचाफा, चैत्रपालवी हे त्यातील काही प्रमुख. शिवाय एकूण २० काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कस्तुरी, एकतारी, एका पावसाळ्यात, चंद्र मावळताना आणि विविध हायकूसंग्रह यांचा त्यांत समावेश आहे. कविता सादर करण्याची त्यांची हातोटी अनोखी होती. त्या नाट्यपूर्ण पद्धतीने कविता सादर करायच्या. त्या काळात शिरीष पै, शांता शेळके, वृंदा लिमये, पद्मा लोकूर, निर्मला देशपांडे या कवयित्रींशिवाय काव्यसंमेलन रंगायचे नाही. या सगळ्याच कवयित्रींमध्ये इतका छान मैत्रीभाव होता. त्यांची अभिनेत्री कुसुम कुलकर्णी यांच्याशीही छान मैत्री होती. या सगळ्यांची वेव्हलेंथ छान जुळायची. त्यामुळे हे मैत्र खास होते. त्यांच्या काव्यवाचन, साहित्यचर्चा अशा मैफली होत. वृंदाबाई, पद्माबाई वृद्ध झाल्या तेव्हा त्या सगळ्यांची काळजी करत असायच्या.
 
शिरीष पै यांनी अनेक पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिल्या आहेत. हे सारे त्या समरसून लिहायच्या. यांतील अनेक प्रस्तावना अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार आहेत.
 
ललित लेखसंग्रहांमध्ये आतला आवाज, आजचा दिवस, मैलोन् मैल, अनुभवांती, सय तर व्यक्तिचित्रणांमध्ये पपा, वडिलांचे सेवेसी हे विशेष लक्षात राहतात. त्यांनी तीन नाटके, दोन कादंबर्‍या, बाल वाङ्मय असे वैविध्यपूर्ण लेखन केले. त्यांनी सुमारे १० पुस्तकांचा अनुवाद केला आहे. त्यांनी गीतेच्या आठव्या अध्यायाचाही अनुवाद केला आहे. 'वडिलांना आठवून' या व्यक्तिचित्रसंग्रहात शिरीष पै यांनी त्यांना लागलेला वाचनाचा नाद, कथा स्पर्धेतील पहिले बक्षीस, लेखनाची लागलेली सवय असा प्रवास उलगडला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिरीष_पै" पासून हुडकले