"सरदेशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary |
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १०:
इ.स.१४२५(शालिवाहन शके १३४७) साली आत्ताच्या कर्नाटकातील गुलबर्गा येथून कोकणात विशाळगडच्या अंमलाखालील देवळे,लांजे,हरचिरी,हातखंबे व पावस या पाच महालांच्या कुलकर्णी वतनाच्या सनदा घेऊन पंडित घराण्यातील पाच बंधू पाच महालांत आले. आज ते पंडित, सरदेशपांडे, सरदेशकुलकर्णी, जमेनीस इ. नावाने ओळखले जातात. यांचे कुलदैवत लक्ष्मी रवळनाथ असून कुलदेवी महालक्ष्मी अंबाबाई आहे.
यांचा मूळ पुरुष अंतोजी तथा अनंत नागोजी पंडित असून त्याचे आठ पुत्र होते. त्यापैकी पद्मनाभ, श्रीधर, नागोजी, शिवाजी व हरी हे पाच भाऊ कोकणात आले.
यांपैकी कोंडगाव(साखरपा) व कनकाडी या संगमेश्वर तालुक्यातील गावात सरदेशपांडे आहेत. लांजा तालुक्यातील केळवली येथे जमेनीस आहेत. साटवली,कोंड्ये,वेरळ,कुर्णे,कणगौली,साठरे-बांबर इ.गावातही या पंडित घराण्याची वस्ती आहे. हे सर्व पंडित घराणे हे काश्यप गोत्री ऋग्वेदी अश्वलायन सूत्राचे असून सर्व कऱ्हाडे ब्राह्मण आहेत.<ref>कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास-लेखक-कै.विष्णू वासुदेव आठल्ये- राहणार शिपोशी, तालुका लांजा, पुस्तक प्रकाशन-इ.स.१९४७</ref>
== प्रसिद्ध व्यक्ती ==
|