"समाजवादी पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
'''समाजवादी पक्ष''' किंवा तत्सम नाव असलेले अनेक राजकीय पक्ष भारतात आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा हा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. (बाकीचे पक्ष - काँग्रेस, हिंदुमहासभा, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग.) पुढे प्रजापक्ष (स्थापना इ.स.१९३०, हा पुढे प्रजा संयुक्त पक्ष झाला) नावाच्या एका समान विचारसरणी असलेल्या पक्षात सामील होऊन तो प्रजासमाजवादी पक्ष तयार झाला. याही पक्षाचे लोहिया समाजवादी, संयुक्त समाजवादी, बहुजन समाजवादी, लोकदल वगैरे नावाचे
जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला '''समाजवादी पक्ष''' हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. हा आजही उत्तरी [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राजकीय पक्ष]] आहे. मुलायम सिंग यादव हे त्यांच्या मुलाने - अखिलेश यादव याने - पक्षातून हकालपट्टी करेपर्यंत या पक्षाचे अध्यक्ष होते. अमरसिंग, अबू आझमी हे पक्षातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती. अनेक चित्रपट अभिनेते व उद्योगपती या पक्षाचे सदस्य आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात या पक्षाचे वर्चस्व आहे. अलीकडच्या काळात मुंबईत या पक्षाने आगमन केले होते. २००८ मध्ये मराठी भाषकांच्या विरोधात या पक्षाने काही प्रक्षोभक भाषणे व भित्तिपत्रके लावल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर या पक्षाची धुमश्चक्री उडाली होती. मुलायम सिंग यांच्या या समाजवादी पक्षात कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा ‘कौमी एकता दल’ हा पक्ष विलीन झाला आहे. (जून २०१६)
भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या
रामविलास पासवान, अजित सिंग, नवीन पटनायक अशा काही नेत्यांनी या नव्या पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट शिवपाल यादव यांनी ‘समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा’ नावाचा नवाच पक्ष स्थापन केला आहे. शिवपाल यांचे वडील बंधू मुलायम सिंग यादव या पक्षाचे अध्यक्ष असतील. (९ मे, २०१७ची बातमी).
|