"बलराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
'''बलराम''' हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा आणि [[कृष्ण|कृष्णाचा]] मोठा सावत्र भाऊ होता. सुभद्रा त्याची सख्खी बहीण. बलरामाला बलभद्र, हलधर, संकर्षण आदी नावे असून हिंदी भाषेत त्याल बलदाऊ म्हणतात. श्रीकृष्ण जयंतीच्या एकदोन दिवस आधी, म्हणजे हरछठ षष्ठीला (मराठी पंचांगाप्रमाणे श्रावण वद्य षष्ठीला) बलराम जयंती असते. नांगर हे बलरामाचे हत्यार असून ते खांद्यावर घेऊन तो हिंडत असतो. रेवती हे त्याच्या पत्नीचे नाव. रेवती मुळात २१ वार उंच होती, बलरामाने तिला नांगराच्या टोकाने दाबून बुटके केले आणि मग तिच्याशी विवाह केला, असे सांगितले जाते.
बलराम लहानपणापासूनच अत्यंत गंभीर आणि शांत होता. तो उत्तम कुस्तीपटू तर होताच शिवाय मुष्टियुद्धात तरबेज होता. कंसाच्या तालामीमध्ये कृष्णाने चाणूराला मारले, तर बलरामााने मुष्टिकाला ठोसे मारून ठार केले.
महाभारत युद्धप्रसंगी बलराम तटस्थ होता. युद्ध सुरू होण्यापूर्वीच तो तीर्थयात्रेला गेला.
बलराम हा शेषाचा अवतार असल्याचे सांगितले जाते. आपआपसातील यादवीमुळे यदुवंशाचा नाश झाल्यानंतर बलराम समुद्रकिनारी अासन लावून बसला आणि त्याने अापला अवतार संपवला.
बलरामाला सुभद्रेचे लग्न शिशुपालाशी व्हावे असे वाटत होते, पण श्रीकृष्णाने बलरामाचा चकवून, सुभद्रेला लग्नमंडपातून पळवून आणण्यास अर्जुनाला मदत केली, आणि त्या दोघांचे लग्न लावून दिले.
|