"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३२:
सद्य:स्थिती-
भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे हरियानातल्या यमुनानगर जिल्ह्यातल्या आदी-बद्रीपासून ते राजस्थानमधल्या कच्छ जिल्ह्यातल्या खिरसरापर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात उत्खनन करण्यात आलं असून, घग्गरच्या प्राचीन प्रवाहाचा (Palaeo channel ) शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सन २००२ ते २००४ आणि सन २००९ ते २०१४ या काळात पुरातत्व विभागातर्फे हरियानातल्या आदी-बद्री, कुरुक्षेत्र, फतेहबाद, हिस्सार, राजस्थानातल्या गंगानगर, हनुमानगड, करणपुरा आणि गुजरातमधल्या खिरसारा, आणि कच्छ या ठिकाणी स्वतंत्रपणे उत्खनन करण्यात आलं. सरस्वती नदी नक्कीच अस्तित्वात असावी, असं सिद्ध करणारे पुरावे या उत्खननातून आढळून आले आहेत.
प्रख्यात शास्त्रज्ञ के. एस. वालदिया यांच्या म्हणण्यानुसार, सरस्वतीला पूर्वेकडं आणि पश्‍चिमेकडं अशा दोन उपनद्या असाव्यात आणि ही नदी हरियाना, राजस्थान व उत्तर गुजरातमधून वाहत असावी. जैसलमेरच्या आजूबाजूला संशोधन करताना तिथल्या स्थानिकांकडून कळलं, की रानाऊ या जवळच्या गावात कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. एवढंच नव्हे तर, तिथं खोदण्यात आलेल्या कूपनलिकेतून नेहमीच गोड पाणी मिळतं. बाकीच्या गावांमध्ये मिळतं तसं खारट पाणी इथं मिळत नाही. इथल्या गावकऱ्यांच्या धारणेनुसार, ‘या गावांखालून सरस्वती नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहतोय’! रानाऊपासून साधारणपणे २२ किलोमीटर दूर असलेल्या; पण रानाऊच्याच रेषेत असलेल्या घंटियाली आणि टनोट या गावांतही हीच परिस्थिती आहे.
सरस्वतीचा उगम उत्तराखंडमधल्या बंदरपूंछ या गढवाल-हिमालयातल्या शिवालिक पर्वतरांगांमधल्या हिमनदीतून झाला असावा. ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’चा वापर करून घग्गर नदीपात्रातल्या लुप्त प्रवाहाचा मार्ग निश्‍चित करण्याचा प्रयत्नही आता सुरू झाला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) संशोधनानुसार, ‘सरस्वतीच्या प्राचीन प्रवाहरेषेवरून आज घग्गर नदी वाहते आणि तोच खरा प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे.’ या नदीच्या आजूबाजूच्या एकूण १४ विहिरींमधल्या पाण्याच्या ‘कार्बन डेटिंग’ पद्धतीनं केलेल्या कालनिर्णयानुसार, हे पाणी आठ हजार ते १४ हजार वर्षं जुनं असावं. इथली पाण्याची प्रतही खूप चांगली आहे. या प्रवाहमार्गाच्या नजीक असलेल्या वनस्पतीही वर्षभर आणि तीव्र उन्हाळ्यातही टिकून राहत असल्याचं आढळून आलं आहे. नदीकाठची गावं गेली ४० वर्षं या विहिरींचं पाणी वापरत आहेत. असं असूनही एकदासुद्धा पाण्याची कमतरता जाणवली नाही, असं गावकरी सांगतात.
लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा नव्यानं घेतला जाणारा पुनर्शोध हा वायव्य भारतातल्या प्राचीन नद्या आणि त्यांच्या काठी बहरलेल्या वस्त्यांचा इतिहास आणि संस्कृती आपल्यासमोर नेमकेपणानं आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणार आहे, यात शंका नाही.