=== मोठ्या सरोवरान इतकेच महत्त्वाचे आहेत लहान मोठे [[तलाव.]] संपूर्ण भारतभर लहान मोठ्या तलावांचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. परंतू योग्य देखभाल न झाल्याने आज कितीतरी तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एक काळ असा होता जेव्हा पाण्याची व्यवस्था करणे त्याचे रक्षण करणे ही सर्व समाजाची जबाबदारी होती.इथला समाज स्वतः च्या हिताच्या गोष्टी स्वतः निर्माण करण्यावर भर देत होता,स्वतःची शक्ती वापरत होता.सत्ताधारी राजा हा जनतेचा सहाय्यक होता. त्यानेच सर्व करावे अशी अपेक्षा नसायची.इंग्रजांच्या[[इंग्रज|इंग्रजां]]<nowiki/>च्या आगमनानंतर मात्र परिस्थिती बदलली. त्यांनी येथील पाणी व्यवस्थेची माहिती जुन्या दस्तावेजामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला.परंतू अशा नोंदी ठेवायची फारशी सवय नसल्याने त्यानी गृहीत धरले कि त्यांनाच खूप काही करायला लागेल. त्यानी माहिती बरीच मिळवली परंतू त्यामागच्या धारणा मात्र समजून घेतल्या नाही.१९ व्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी सर्वत्र फिरतान मिळालेल्या माहितीच्या आधारे जी gazettier तयार केली त्यामध्ये अनेक मोठ्या तलावांचा उल्लेख मिळतो. ===
==== कोणी निर्माण केली ही परंपरा ? ====
==संदर्भ ==
शेकडो हजारो तलाव निर्माण करणारे हात कोणाचे होते हे शोधताना भारतातील कितीतरी समाजांची नावे मि