"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) No edit summary |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १४:
अन्त्येष्टी संस्कारामध्ये [[यम]] देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस.या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने.आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.
गरुड पुराणात सांगितले आहे की शव उचलण्यापूर्वी घरात एक पिंड द्यावा. शव यात्रा सुरु करण्यापूर्वी दरवाजात दुसरा पिंड द्यावा. शव यात्रा चौकात आल्यावर एक पिंड द्यावा. स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी एक पिंड द्यावा.आणि चिता स्थानी एक पिंड द्यावा . असे एकूण पाच पिंड द्यावेत.
यानंतर दहनाचा विधी करावा. पवित्रीकरण,प्राणायाम, संकल्प ,जानव्याचे अपसव्य,यमाला नमस्कार,यमाची स्तुती,स्मशान भूमी प्रार्थना,स्मशान जल प्रार्थना,भूमी प्रोक्षण,अग्नी स्थापना,रेखाकरण,चितिकरण,सूक्त पिंडदान( प्रेताच्या कपाळ,मुख,हात व पाय या ठिकाणी सातूचे पिंड ठेवणे,शवाला पाणी पाजणे, अग्निसंस्कार,[[अग्नी]],पितर व मृताला प्रार्थना,घटाचा स्फोट,अप्रदक्षिणा,तिलांजली असे सर्व विधी केले जातात.<ref>अंतिमा-चंद्रकांत बारहाते</ref>
==बाह्य दुवे==
|