"आँग सान सू क्यी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:नोबेल पारितोषिकविजेते टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ७:
 
{{विकिकरण}}
==जीवन ==
आँग सान सूकी यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजात झाले होते. या महाविद्यालयास त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि आस्थेने भेट दिली. तेथील वातावरण आणि गतकालीन आठवणींनी त्यांना गहिवरून आले होते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही वावरत असलो तरी भारतापासून कधीही दूर नसतो. किंबहुना भारतीय नागरिक असल्याचा भास होतो असे त्यांनी आदरपर्वूक नमूद केले. भारताशी आपले नाते हे केवळ बौध्दिक नाही तर मानसिक आहे. या मैत्रीचा गहिरा रंग त्यांनी हळुवारपणे रेखाटला. आपल्या इच्छा वा महत्वाकांक्षा या चूक नाहीत, हे श्रीराम कॉलेजने शिकविले लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रदीर्घ संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांना श्रीराम महाविद्यालयाने दिली. ही त्यांची मते प्रेरक आणिा स्फूर्तीदायक वाटतात. आपल्या छोटेखानी पण प्रभावशाली अशा भाषणातून त्यांनी विद्यार्थिनींशी चांगलीच जवळीक साधली व त्यांची मने जिंकून घेतली, हे येथे विशेषत्वाने नमूद केले पाहिजे. एखादा राजकीय नेता आपल्या संस्थात्मक स्नेह भावाच्या आधारे लोकजीवनाशी किती जवळचे संपादन करु शकतो, हे त्यांनी विचारपूर्वक आणि कृतीतूनही दाखवून दिले त्यामुळे त्यांच्या नेहरु स्मृती व्याख्यानापेक्षाही त्यांची ही लेडी श्रीराम कॉलेजची भेट महत्वाची असल्याचे दिसून येते.
बदलाचे वारे
दीर्घकाळ नजर कैदेत राहून राजकीय विजनवातातून बाहेर पडल्यांनतर सुकी यांनी एकानंतर एक विक्रम नोंदविले आहेत. त्यांनी 2012 च्या पोटनिवडणुकीत दमदार विजय संपादन केला आणि आता त्यांचा प्रवास राजकीय सत्तेच्या दिशेने झेपावत आहे. त्यांचे समर्थक व अनुयायी हे प्रबळ सत्ताकांक्षेने भारावले आहेत. त्यांच्या नॅशनल डेेमोक्रेटीक लिग या पक्षाला खरोखर उज्वल भविष्यकाळ आहे. सुकी यांच्या भारत भेटीनंतर त्यांचे नैतिक बळ उंचावले आहे. आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी आता म्यानमारच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याच्या दृष्टीने वाटचाल आरंभेली आहे.
सुकी यांच्या भारत भेटीनंतर लगेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्यानमारला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी सुकी यांच्या संघर्षाचे कौतुक केले आणि त्यांच्या अथक परिश्रमातून प्रदीर्घ अशा लोकशाही प्रस्थापनेचा लढा सफल होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांनी म्यानमारवर तेथील लष्करी राजवटीच्या काळात जे जाचक आर्थिक निर्बंध अमेरिकेले लादले होते ते सर्व मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे म्यानमारचा राजकीय व आर्थिक एकाकीपणा संपल्याची सुचिन्हे दिसत आहेत. उदारीकरणाच्या लाटेमध्ये आता जगातील कुठलाही देश बंदंीस्त राहून आर्थिक विकास करु शकत नाही, हे कटू सत्य आहे. म्यानमारचे एकाकीपण संपावे तेथील राजकीय लोकशाही सुरळीत व्हावी तसेच सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने दमदार पावले टाकावीत म्हणून सुकी यांनी पुढे यावे आणि त्यांनी नजिकच्या भविष्य काळामध्ये म्यानमारला एक समर्थ आणि बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी कंबर कसावी. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मागास, गरीब आणि एकाकी पडलेल्या म्यानमारला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी सुकी यांचे नेतृत्व अधिक पक्षदर्शक आणि तेवढेच फलदायी ठरेल यात शंका नाही तोच त्यांच्या भारत भेटीचा संदेश होय.
 
 
==इतर ==
ब्रह्मदेश हा अखंड भारताचा एक भाग होता. ब्रह्मदेशातील लोकशाही प्रक्रिया एका नव्या वळणावर उभी आहे आणि ब्रह्मदेशातील लोकशाही प्रक्रिया गेली अनेक वर्षे लष्करशाहीच्या प्रभावामुळे कुंठित झाली होती. आँग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रॅसी या पक्षाने अलीकडे झालेल्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविला आहे. तथापि लोकशाही प्रक्रियेने त्यांच्याकडे सत्ता कशी सुुपूर्द होईल याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. आँग सान सू की यांनी म्यानमारमध्ये लोकशाहीच्या स्थिरीकरणासाठी अभूतपूर्व संघर्ष केला आहे. त्यांच्या अखंड संघर्षामुळे म्यानमारला लोकशाहीचे सोनेरी क्षण अनुभवता येत आहेत. गेली अनेक वर्षे त्या लष्करशाहीच्या नजरकैदेत होत्या. त्यांनी म्यानमारमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी केलेल्या संघर्षामुळे त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.
अभूतपूर्व संघर्षाची परिणती