"सांगली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३८:
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली.
▲'नाटक हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच [[विष्णुदास भावे]] यांनी पहिले मराठी नाटक [[सीतास्वयंवर]] सादर केले.
औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे [[विठोजीराव चव्हाण]] व प्रतिसरकारचे प्रणेते [[नाना पाटील]] यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.
Line ७६ ⟶ ७४:
सांगली जिल्ह्यात एकूण नागरी सहकारी बँकांची संख्या २५ असून त्यात २ हजार कोटीच्या ठेवी आहेत. २५ बँकांपैकी ५ बँकांचे परवाने रद्द झाले आहेत. रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या २ बँका आहेत. चार बँकांचे विलीनीकरण झाले आहे, तर दोन विलीकरणाच्या मार्गावर आहेत.
परवाना रद्द झालेल्या बँका
रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या बँका : कृष्णा व्हॅली, धनश्री महिला.
|