"संभाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३:
संभाजीराजांचा जन्म [[१४ मे]], [[इ.स. १६५७]] रोजी [[किल्ले पुरंदर]] येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, [[सईबाई|सईबाईंचे]] निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर [[पुणे|पुण्याजवळील]] [[कापूरहोळ]] गावची [[धाराऊ]] नावाची स्त्री त्यांची ''दूध आई'' बनली. संभाजीचा सांभाळ त्यांची आजी [[जिजाबाई]] यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांच्या सावत्र आई, [[सोयराबाई]] यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
 
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते.राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना [[आग्रा भेट|आग्रा भेटीच्या]] वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्‍र्‍याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना [[मोरोपंत पिंगळे|मोरोपंत पेशव्यांच्या]] मेहुण्याच्या घरी [[मथुरा|मथुरेला]] ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
 
==तारुण्य आणि राजकारण्यांशी मतभेद==