"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎साम्राज्याची घसरण: शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २५:
[[इ.स. १६८१|१६८१]] मध्ये महाराजांचे जेष्ठ पुत्र [[छत्रपती संभाजी महाराज|संभाजी]] राजे बनले आणि त्यांनी वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली.
राजपुत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या सार्‍या राजदरबाराला आणि ५००००० सैन्याला घेऊन दक्षिणेला आला.
अपुरे सैन्य व फंदफितुरी असूनदेखील छत्रपती संभाजी महारांजानी १६८१ ते १६८८ अशी यशस्वी झुंज दिली. या काळात संभाजी महारांजानी एकही किल्ला गमावला नाही की आरमारातले एकही मोठे जहाज मोगलांच्या हाती लागून दिले नाही. जंजिर्‍याचे सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज, मोगल या चारही आघाड्यांना हा राजा पुरून उरला
.
वतनदारी मिळवण्यासाठी संभाजी महाराजांच्या काही स्वकीयांनी मोगलांशी हात मिळवणी केली, मोगलांना त्यांची खबरबात दिली आणि १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. त्यांचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुत्यूचा परिणाम औरंगजेबाच्या अपेक्षेच्या उलट झाला, मराठ्यांनी शरण न जाता त्यापासून स्फूर्ती घेतली व ते अधिक तीव्रतेने लढू लागले.
 
संभाजीचाछत्रपती संभाजी महाराजांचे बंधू [[राजाराम]] हा नंतर राजा बनला. [[इ.स. १७००|१७००]] मध्ये [[सातारा|सातारला]] मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबिज केले. याच काळात राजारामाचा [[सिंहगड|सिंहगडावर]] मृत्यू झाला आणि त्याची पत्नी ताराबाई हीने त्यांचा मुलगा [[संभाजी दुसरा]] याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला. तिने युद्धविरामाचा प्रस्ताव दिला पण बादशाह तयार झाला नाही. त्याच वर्षी मराठे [[नर्मदा|नर्मदेच्या]] पार पोचले. माळव्याच्या मराठ्यांनी केलेला नवीन हल्ला आणि [[हैदराबाद|हैद्राबादमध्ये]] केलेली लूट यामुळे बादशाह वैतागला. दोन दशके चाललेले दक्षिणेचे युद्ध त्याच्या खजिन्यावर ताण देत होते. [[इ.स. १७०५|१७०५]] मध्ये औरंगजेब आजारी पडला आणि दोन वर्षांनी मरण पावला.
 
बादशहाच्या मृत्यूनंतर [[छत्रपती शाहूजी|शाहूजी]] जो संभाजीचाछत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र(शिवाजीचाम्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नातू) होता त्याला [[बहादुरशाह|बहादुरशाहने]] सोडले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी मराठा नौदल प्रमुख [[कान्होजी आंग्रे]] याची मदत घेऊन शाहूने निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता पेशवा बनला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य कधीच उभारू शकले नाही आणि मराठा साम्राज्य भारतातील सर्वांत शक्तिशाली राज्य बनले.
 
[[इ.स. १७१३|१७१३]] मध्ये [[फारूख्सियार]] मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे [[सय्यद बंधू]] म्हणून ओळखले जात होते. ते [[अलाहाबाद]] आणि [[पटणा]] येथील राज्यपाल होते. पण बादशही बरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरूद्धच्या लढाईत सामील झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि [[गुजरात]], [[माळवा]] इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले.