७९
संपादने
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. विशेषणे टाळा |
|||
याचे सेवनाने यकृत मजबूत होते व मुत्राशयाचे आजार होत नाहीत. याचे नियमितसेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात.यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते.अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे.
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे नाव जंम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभीपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
==स्थान==
मूळ भारतीय असलेला हा वृक्ष [[म्यानमार]], [[श्रीलंका]], [[मलेशिया]], ते थेट [[ऑस्ट्रेलिया]] खंडातही सापडतो. समुद्र्सापाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते. माफक तापमान, उत्तम निचरा होणारी जमीन, ३०० इंचापर्यंत वार्षिक पर्जन्यमान या झाडास चालते.
==जाती व आकारमान==
नैसर्गिक लागवड बियांपासून होते. तर संकरित जातींची लागवड कलम पद्धतीने करतात. मुख्य जाती म्हणजे मधुर फळाचा वृक्ष उर्फ ‘राजजम्बू’ , व लहान आकाराच्या, कमी गराच्या फळांचा वृक्ष म्हणजे ‘क्षुद्रजम्बू’ किंवा ‘काष्ठजांभूळ’. माथेरानला सर्वत्र वाढणारी ‘लेंडीजांभूळ’ दुसऱ्या प्रकारात मोडते. मुख्यत: उष्ण कटिबंधीय देशांतून वास्तव्य असलेला हा वृक्ष सरळसोट १५० फुटांपर्यंत सुधा वाढतो, खडकाळ भूमीत मात्र यास ठेंगणे रूप प्राप्त होते. पाने सुवासिक ग्रंथीयुक्त असतात. ती चकचकीत चामड्यासारखी दिसतात. या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या कडेने स्पष्ट असणारी शीर पानाच्या खालपासून टोकापर्यंत जाते व इतर सर्व शिरांशी संयोग करते. या शिरेस ‘इंट्रामार्जिनल व्हेन’ अशी संज्ञा शास्त्रज्ञांनी दिलेली आहे व टी शीर या कुलांतील वनस्पतीचे ‘कुलभूषण’ ठरली आहे. फुले नाजूक हिरवट, पांढरी सोनेरी रंगाची असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो व अंती फळ तयार होते.
फळे अंडाकृती, प्रथम परिपक्व झाल्यावर तांबूस-वांगी रंगाची तर अतिपक्व झाल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. या फळाची गणना ‘मृदूफळात’ होते व ते साधारण २-२ १/२ इंच लांबीचे, लांबोड्या आकाराचे असते. फळात एकच बी असते.
जांभूळ वृक्षाचे लाकूड टणक, टिकाऊ असून ते पाण्यात कुजत नाही, रंग साधारण भुरकट तपकिरी असून त्याच्या प्रत्येक घन फुटाचे वजन २०-२२ किलो भरते. लाकडाचा उपयोग घर बांधणीसाठी, छोटी अवजारे बनविण्यासाठी करतात. फांद्या,खोड यांचा उपयोग जळणासाठी व पाल्याचा उपयोग गुरांच्या चारासाठी होतो. चांगली वाढलेली जांभूळ शेतकऱ्यास वर्षात ५० किलो उत्पन्न देते. फळमाशा व खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करावे लागते.
==उपयोग==
हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातूनही फार महत्वाचा ठरतो. जांभळाचे फळ दीपन, पाचन व यकृतोत्तेजक आहे. घरगुती औषधात जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडात ठोकलेला लोखंडी खिळा वर्षभरात विरून जातो. तसेच पाने ठेचून लोखंडाच्या भूशाबरोबर एकत्र करून ६ महिने ठेवल्यास उत्तम लोहक्षार मिळतो.
जांभळाच्या सुक्या बियांतील वैशिष्ठ्य म्हणजे त्यांत रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्व सापडले आहे. सुगंधी पाने व गुणकारी बीज,फळे,फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधनांसाठी केला असल्यास नवल नाही. मुखशुद्धीसाठी बियांचे चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी पाने व फळांचा उपयोग केशकलपासाठी, पोटात घेण्यास जांभूळ फळ तर बाहेरून केसाला लावण्यास अर्क, याविषयी जुन्या ग्रंथातून उल्लेख आहे. जांभूळ हा वृक्ष हिंदू व बौद्ध धर्मिय लोकांनी एक पवित्र वृक्ष म्हणून मानलेला आहे. त्यामुळे हा वृक्ष जरी वन्य असला तरी बऱ्याचशा उद्यानातून, उपवनातून, देवळाभोवती व देवरायातून लावलेला आहे. गणेश,शिव,कृष्ण या देवतांना जांभळाची फुले प्रिय असतात असा समज आहे. काही ठीकाणी जांभळाच्या पानाचे तोरण मंगल समयी दाराला लावण्याची प्रथा आहे. ढगांचा राजा ‘वरून’ पृथ्वीवर जांभूळ वृक्षाच्या स्वरुपात अवतरला आणि म्हणूनच त्याच्या फळांचा रंग गडद मेघासारखा झाला असाही लोकसमज आहे. सुसर आणि जांभूळ वृक्षावरील माकडाचे काळीज हि एक लोकप्रिय नीतीकथा आहे. जांभूळ व माकडे यांचे अतूट नाते दिसते,ते या पूर्वापार चालत आलेल्या कथेचे बीज असावे. तिरूचिरापल्ली शहरानजीकच्या महादेव मंदिरात एक अजस्त्र डेरेदार जांभूळ वृक्ष आहे. हा महादेव ‘जम्बूकेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे.
जांभूळ वृक्ष समशीतोष्ण कटिबंधीय,रुंदपर्णीय अविभाज्य घटक आहे. अजनी,पिसा,हिरडा,आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात [[महाबळेश्वर]], [[माथेरान]], [[भीमाशंकर]],[[वासोटा]],[[कोयना अभयारण्य|कोयना]] परिसर, [[सावंतवाडी]]-[[आंबोली]] परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचे हा वृक्ष या आवडत्या गोष्टी आहेत. फुलांचे परागण, बियांचे विखुरणे व पुनरुज्जीवन या गोष्टी बहुधा त्यांच्यामुळेच होतात. जंगलातील मसण्या उद व कोल्हे हे प्राणी जांभळे खातात. पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यांना हे फळ फार आवडते. या झाडाचा फुलोरा मधमाश्या, फुलपाखरे, पतंग, मोठ्या निळ्या माशा यांना आकर्षित करतो. या वृक्षाच्या पानावर रेशिमकीडे (टसर सिल्क वर्म) उत्तमरित्या पोसले जातात.
तशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लहडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठच्या अव्ह्ल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणाऱ्यांच्या पायाखाली येवून जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाड आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत उभा आहे....एकटाच वांद्राच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाची दर्शन ठिकठिकाणी होते. जिजामाता उद्यान, हँगिंग गार्डन, बोरिवलीच राष्ट्रीय उद्यान, पवईच उद्यान ते अनेक छोटी उद्यान जांभूळ वृक्षाच संवर्धन करीत आहे.
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे नाव जंम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभीपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
==जाती==
|
संपादने