"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
[[चित्र:Draupadi humiliated RRV.jpg|thumb|right|250px|विराट राजाच्या दरबारात कीचकाकरवी अपमानित झालेली द्रौपदी (चित्रकार : [[राजा रविवर्मा]])]]
'''द्रौपदी''' ही [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती [[पांचाल|
== जन्म ==
द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवून अर्धे राज्य घेतल्यामुळे [[द्रोणाचार्य|द्रोणाचार्यांचा]] वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती [[पांचाल]] राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई.
== पण व पांडवांशी विवाह ==
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा हिने
== द्यूतप्रसंग आणि वस्त्रहरण ==
द्यूतप्रसंगी धृतराष्ट्र पुत्र [[दुर्योधन]] व [[दुःशासन|दुःशासनाकरवी]] झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जीवनातील सर्वात मोठा मानहानीचा प्रसंग होता. त्या प्रसंगातदेखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बुद्धिमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती. "माझ्या पतीने आधी स्वतःला पणाला लावले असल्यास नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का?" या तिच्या प्रश्नाने भीष्म पितामहांनादेखील
दुर्योधन व दुःशासनाच्या हीन कृतींकडे दुर्लक्ष
द्रौपदीने अशी प्रतिज्ञा केली होती की तिच्या केसांना धरून
== वनवासात आणि महाभारतीय युद्धात ==
वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्न कौरवांचा मेव्हणा व [[दुःशला|दुःशलेचा]] पती [[जयद्रथ]] याने केला होता. मात्र युधिष्ठिरामुळे त्याला जीवदान मिळाले. अज्ञातवासाच्या काळात द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी. [[विराट]] राजाची पत्नी [[सुदेष्णा]] हिच्या महालात सैरंध्रीच्या रूपात काम करतानादेखील सुदेष्णेचा भाऊ व विराट राजाचा सेनापती [[कीचक]] याने द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
द्रौपदीने विवाहापूर्वी अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा पति म्हणजे भीम. द्यूतप्रसंगी दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिशोध म्हणून त्याने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती,
द्रौपदीला युधिष्ठिरापासून [[प्रतिविंध्य]], भीमापासून [[श्रुतसोम]], अर्जुनापासून [[श्रुतकर्मा]], नकुलापासून [[शतानीक]] व सहदेवापासून [[श्रुतसेन]] असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने [[द्रोणाचार्य]]-पुत्र [[अश्वत्थामा]] याने महाभारत युद्धसमाप्तीनंतर एके रात्री एकाच राहुटीमधे झोपलेल्या या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात पाच पांडवांसह निवृत्तीसाठी द्रौपदीनेदेखील नगेंद्र हिमालयाचा मार्ग धरला होता. मात्र पर्वताच्या पायथ्याशीच ती कोसळून पडली.
|