"प्राथमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन |
||
ओळ ७:
=== समावेश ===
प्राथमिक शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम अधिकृतरित्या समित्या स्थापून स्थानिक राज्यांच्या मंडळांद्वारे प्रकाशित करतात. यात [[भाषा]], [[विज्ञान]], [[इतिहास]], [[भूगोल]], [[गणित]], यासांरख्या अजून काही विषयांची प्राथमिक ओळख असते. याशिवाय [[चित्रकला]], [[हस्तकला]], [[शारिरीक शिक्षण]] या विषयांचाही समावेश असतो.▼
माझी शाळा
कचरेवाडी ... नावावर जाऊ नका . नाव खोटं पण लक्षण मोठं ..
▲प्राथमिक शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम अधिकृतरित्या समित्या स्थापून स्थानिक राज्यांच्या मंडळांद्वारे प्रकाशित करतात. यात [[भाषा]], [[विज्ञान]], [[इतिहास]], [[भूगोल]], [[गणित]], यासांरख्या अजून काही विषयांची प्राथमिक ओळख असते. याशिवाय [[चित्रकला]], [[हस्तकला]], [[शारिरीक शिक्षण]] या विषयांचाही समावेश असतो.
कचरेवाडी , तालुका मंगळवेढा ,जिल्हा सोलापूर .... एक १००/१२५ उंबऱ्याचं गाव.,मूळ रस्त्याच्या आडबाजूला , S T ची सोय नाही. (अर्थात हे मी ५०/५५ वर्षांपूर्वीची परिस्थिती सांगतोय ) असे गाव अचानक गेल्यावर्षी पेपरात आले आणि माझ्या आठवणी जागवल्या. कारण त्या गावाशी/शाळेशी माझे नाते होते.
गेल्या वर्षी त्या गावातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी CA च्या परीक्षेत भारतात पहिला आला. मला अभिमान वाटला त्या शाळेचा ,तेथील शिक्षणाचा ,आणि शिक्षकांचा . कारण मी त्या शाळेत एक वर्ष होतो , त्यावेळी ते वर्ष महत्वाचे होते ,व्ह फा फायनल म्हणजे सातवी , बोर्डाची परीक्षा.
माझे गाव तिथून अडीच तीन मैलावर , आमच्या गावात चौथी पर्यंतच शाळा असल्याने आम्ही सर्वजण १०/१२ जण सातवीला कचरेवाडीला शाळेत जात होतो.
परीक्षेच्या साधारण एक दीड महिना आधी गुरुजींनी वर्गात आम्हा सर्वाना सांगितले ,' सोमवारपासून तुम्हाला फक्त एकदाच गावी जायला मिळेल . तुम्ही इथेच शाळेत रहायचं आहे ,तसे घरी सांगून या सोमवारी येताना अंथरून पांघरून घेउन या ,तुमची झोपायची सोय शाळेतच केली जाईल. सर्वानी इथेच अभ्यास करायचा आहे . फक्त शनिवारी घरी जाऊन सोमवारी परत यायचे आहे ,कुणीही कुठल्याही कारणाने शाळा 'बुडवायची' नाही .कारण आता परिक्षा जवळ आली आहे , 'आपल्या ' शाळेचा निकाल १०० टक्के लागला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण चांगल्या मार्काने पास होऊन पुढे जावा "
आणि झाले , सोमवारपासून आम्ही शाळा सुटली कि शाळेच्या समोरच्या पटांगणात अर्धा एक तास खेळायचो तेवढ्यात गुरुजी घरून २०/२५ भाकरी आणि कालवण घेऊन यायचे आणि मग आम्ही सर्वजण ( गुरुजींसह ) मिळून जेवायचो. आणि अभ्यासाला बसायचो , गुरुजी आम्हा सर्वांसाठी चिमण्या आणि कंदील घेऊन यायचे ,सकाळी लवकर उठून आमच्यासाठी चहा घेऊन यायचे ,हे सर्व एक दोन दिवस नाही तर सतत एक दीड महिना चालू होते .नंतर परीक्षा केंद्र मंगळवेढ्यास ( म्हणजे तिथून पुढे दोन अडीच मैल) ,आम्हाला रोज बैलगाडीतून घेऊन जायचे , परत शाळेत आणायचे असे चार दिवस चालू होते इतके मनापासून शिकवल्यावर कोण शिकणार नाही ,अपेक्षेप्रमाणेच आमचा निकाल १०० टक्के लागला .
पण धन्य ते शिक्षक आणि धन्य ती शाळा. मी त्या शिक्षकांचा आणि शाळेचा जन्मभर ऋणी राहीन .
गुरुर देवो भव ।
== इंग्लंड ==
|