"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
 
== पण व पांडवांशी विवाह ==
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा सम्राट द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी माशाचा डोळा नेम धरून फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला होता. मात्र कुंतीच्या तोंडून अनावधानानेअनवधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील वरावे लागले.
 
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्‍नी सत्यभामा हिने गृहीणीपद व पतिची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच [[द्रौपदी-सत्यभामा-संवाद]] असे म्हणतात.
 
== द्यूतप्रसंग आणि वस्त्रहरण ==
द्यूतप्रसंगी धृतराष्ट्र पुत्र [[दुर्योधन]] व [[दु:शासनदुःशासन|दु:शासनाकरवीदुःशासनाकरवी]] झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जीवनातील सर्वात मोठा मानहानीचा प्रसंग होता. त्या प्रसंगातदेखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बुद्धिमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती. "माझ्या पतीने आधी स्वत:लास्वतःला पणाला लावले असल्यास नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का?" या तिच्या प्रश्नाने भीष्म पितामहांनादेखील निरूत्तर केले होते. वस्त्रहरणासारख्या प्रसंगामधे पतींनी सर्व अधिकार गमावल्यानंतर द्रौपदीने आपला सखा कृष्ण याचा धावा केला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देत कृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण केले.
 
दुर्योधन व दु:शासनाच्यादुःशासनाच्या हीन कृतींकडे दुर्लक्ष करणार्‍या धृतराष्ट्रालादेखील द्रौपदीच्या वक्तव्याची दखल घेणंघेणे भाग पडलंपडले होतंहोते. आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचविण्यासाठी धृतराष्ट्राने तिला अनेक वरदाने देऊ केली होती, मात्र क्षत्रिय स्त्रीच्या धर्मानुसार आपल्याला केवळ दोनच वर मागण्याचा अधिकार आहे, असे उत्तर देऊन द्रौपदीने स्वत:वरस्वतःवर ओढवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगातदेखील आपल्या इच्छांवर असलेला संयम व ताळ्यावर असलेले चित्त दाखवून दिले होते. द्रौपदीच्या चतुराईमुळेच पांडव व त्यांचे पुत्र, त्यांच्या रथ व अस्त्र शस्त्रांसकट दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते व त्यांना त्यांचे राज्यदेखील परत मिळाले होते. पण युधिष्ठीराच्यायुधिष्ठिराच्या द्यूलालसेमुळे त्यांना पुढच्याच क्षणी राज्य गमवावे देखील लागले व बारा वर्षांचा [[वनवास]] आणि एक वर्षाचा [[अज्ञातवास]] त्यांच्या नशीबी आला.
 
द्रौपदीने अशी प्रतिज्ञा केली होती की तिच्या केसांना धरून ओढणार्‍या दु:शासनाच्या छातीचे रक्त जोपर्यंत ती आपल्या केसांना लावणार नाही, तोपर्यंत ती केस मोकळेच ठेवेल. भीमाने महाभारतातील युद्धामधे दु:शासनाचादुःशासनाचा वध करून, त्याची छाती फोडली आणि त्याचे रक्त द्रौपदीच्या केसांना लावून तिची वेणी घातली व द्रौपदीची प्रतिज्ञा पूर्ण केली.
 
== वनवासात आणि महाभारतीय युद्धात ==
ओळ २९:
 
==द्रौपदी या महाभारतातील व्यक्तिरेखेवर अनेक पुस्तके लिहिली गेली; त्यांपैकी काही ही :-
* कीचकवध (मराठी नाटक, लेखक - [[कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर]])
* द्रौपदी (हिंदी, लेखिका - प्रतिभा राय)
* द्रौपदी की आत्मकथा (हिंदी, लेखिका - मनु शर्मा)
* पांचाली (लेखिका - डॉ. [[सुमती क्षेत्रमाडे]])
* पांचालीचे महाभारत - मयसभा (मूळ : द्रौपदी की महाभारत, हिंदी लेखिका - चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी, मराठी अनुवाद - डॉ. प्रतिमा काटीकर)
* महाभारतावरील व्याख्याने - भाग ११ वा - महाराणी द्रौपदी (वक्ते/लेखक - [[बाळशास्त्री हरदास]])
* सती द्रौपदी (हिंदी, लेखक - स्वामी अखण्डानन्द सरस्वती)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले