"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन nowiki ?
ओळ १११:
{{संदर्भ हवा}}
 
<s>"भा" या संस्कृत शब्दाचा अर्थ "तेज" "तेजस्विता" "द्युतिमानता" असा आहे.</s>
 
<s>"रत" म्हणजे रममाण झालेला म्हणजे त्या तेजस्वितेत, त्या द्युतिमानतेत रममाण झालेला देश म्हणजे भारत.</s>
 
===कथा===
ओळ १२६:
[[चित्र:Mahabharata_BharatVarsh.jpg|इवलेसे|महाभारत काळातील भारतवर्षाचा नकाशा|rigt|150px]]
भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील [[भीमबेटका]] येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू [[सिंधू संस्कृती|सिंधू संस्कृतीमध्ये]]. रुपांतर झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = इंट्रोडक्शन टू द एन्शियंट इंडस व्हॅली|भाषा=इंग्लिश|दुवा=http://www.harappa.com/indus/indus1.html
|ॲक्सेसदिनांक = २००७-०६-१८|वर्ष= १९९६ |प्रकाशक = Harappa}}</ref>. इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या [[पाकिस्तान|पाकिस्ताना]]<nowiki/>त झाली. [[मोहेंजोदडो]] व [[हडप्पा|हरप्पा]] ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) [[वैदिक काळ]] म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की [[युरोप]][[मध्य अशियातूनआशिया|मध्य अशिया]]<nowiki/>तून आलेल्या [[आर्य]] लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून [[सिंधू संस्कृती]] नष्ट केली व [[वैदिक काळ]] सूरू झाला<ref>[[डिस्कव्हरी ऑफ इंडिया]]-ले. पंडित [[जवाहरलाल नेहरु]]</ref>. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व [[हडप्पा संस्कृती|हडाप्पा]][[मोहेंजोदडो|मोहोंदोजडोची]] संस्कृती या एकच होत्या. सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या [[सिंधु नदी|सिंधू]][[सरस्वती नदी|सरस्वती]] नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील [[सरस्वती नदी]] ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन [[सरस्वती नदी]] ही [[पंजाब]], [[राजस्थान]] व [[कच्छ जिल्हा|कच्छ]] [[गुजरात]] मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती [[गंगा नदी|गंगेच्या]] खोर्यात पसरली. विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.
 
<poem>
ओळ १३७:
[[चित्र:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|thumb|left|[[अजिंठा-वेरूळची लेणी]] येथील भित्तीचित्रे]]
 
इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात [[अलेक्झांडर द ग्रेट|अलेक्झांडरच्या]] आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. [[चंद्रगुप्त मौर्य|चंद्रगुप्त मौर्याने]] [[मगध]]च्या [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याची]] मुहूर्तमेढ रोवली ज्याचा [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाने]] कळस गाठला. [[कलिंगाचे युद्ध|कलिंगाच्या युद्धात]] मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]] स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = मौर्य वंष|भाषा=इंग्लिश |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = जोना लेंडरलिंग |ॲक्सेसदिनांक =२००७-०६-१७}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]] प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर काही काळ [[उत्तर भारत|उत्तर भारतात]] अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्याने]] भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. [[साहित्य]], [[गणित]], [[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://knowindia.gov.in/knowindia/culture_heritage.php?id=15|शीर्षक=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|ॲक्सेसदिनांक=२०१४-०२-०२|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. [[दक्षिण भारत|दक्षिण भारतात]] अनेक साम्राज्ये उदयास आली. [[तमिळनाडू|तमिळनाडूतील]] [[चोल साम्राज्य]], [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]], [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सातवाहन]], या काळातील [[कला]], स्थापत्यशास्त्रातील[[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रा]]<nowiki/>तील प्रगती आजही खूणावते. [[अजिंठा-वेरूळची लेणी]], [[वेरुळ]], [[हंपी|हंपीचे]] प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली [[चोल साम्राज्य|चोल साम्राज्याचा]] विस्तार [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] [[इंडोनेशिया]] या देशापर्यंत पोहोचला होता.
 
११ व्या शतकात [[इराण|इराणमधील]] [[मोहम्मद बिन कासीम]] ने [[सिंध प्रांत|सिंध प्रांतात]] आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर [[इस्लामी राजवट]] लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[तैमूरलंग|तैमूरलंगने]] केलेले दिल्लीतील शिरकाण(तैमूरलंग) मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे [[इतिहासकार]] नमूद करतात.{{संदर्भ हवा}} [[दिल्ली सल्तनत]] ते [[मोगल|मोगलांपर्यंत]] अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील [[मुघल साम्राज्य|मुघल राजवट]] सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] स्थापना केली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्न‍‍स्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या युद्धात]] दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. [[इंग्लिश|इंग्लिश लोक]], [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. [[बंगाल]]पासून सुरुवात करत, [[म्हैसूर]]चा [[टिपू सुलतान]], १८१८ मध्ये [[मराठा साम्राज्य]], १८५० च्या सुमारास पंजाबमधील[[पंजाब]]<nowiki/>मधील [[शीख साम्राज्य|शिख]] व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] च्या कारभाराखाली घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|शीर्षक=History : Indian Freedom Struggle (1857-1947)|ॲक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre|National Informatics Centre (NIC)]] |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref>. [[१८५७]] मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी कडून कारभार ब्रिटfश सरकार कडे गेला.
 
[[चित्र:Lokmanya Bal Gangadhar Tilak touchup.jpg|
[[लोकमान्य टिळक]] यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने]] राष्ट्रीय पातळीवर [[भारतीय स्वातंत्र्यलढा|स्वातंत्र्य चळवळ]] सुरू केली. १९२० मधे टिळकांच्या मृत्युनंतर [[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] चळवळीची सुत्रे हाती घेत अनेक चळवळी केल्या.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA 3">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia|प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 455 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> सरते शेवटी [[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७]] रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग, आजचा [[पाकिस्तान]] व [[बांगलादेश]], हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA..">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia |प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = १९९७ |पृष्ठे = ३२२ |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> २६ जानेवारी १९५० रोजी [[भारतीय संविधान]] लागू झाले व भारत [[गणतंत्र राष्ट्र]] बनले व ते ''जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र'' अशी आज बिरुदावली मिरवत आहे.<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=CIA Factbook: India |कृती=[[CIA Factbook]]| दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html |ॲक्सेसदिनांक=2007-03-10}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले