"उद्धव स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
IShrinivas (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ २:
[[File:Ram Panchayatan at Takali.jpg|thumb|टाकळी येथील रामपंचायतन]]
'''आख्यायिका :''' [[नाशिक]] जवळील दशकपंचक गावचे गिरिधरपंत कुलकर्णी मृत्यू पावल्यावर त्यांच्या पत्नी सती चालल्या होत्या. त्यासाठी नदीकिनारी आल्यावर त्यांना एक तेजःपुंज यती (समर्थ रामदास) नदीमध्ये डोळे मिटून जप करत असताना दिसले. त्यांना त्या स्त्रीने नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज ऐकून समर्थांनी त्यांना 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. परंतु मृत्यू पावलेला पती व स्वतःही सती जाऊन मृत्यूला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्र्या त्या स्त्रीने विचारले की हा आशीर्वाद कधी पूर्ण होईल? तेव्हा समर्थांनी हा आशीर्वाद रामाचा आहे असे सांगितले व मंत्र सामर्थ्याने त्या प्रेतास जिवंत केले. या दांपत्याला पुढे आठ मुले झाली. त्यातील पहिले म्हणजे उद्धव होते. उद्धव स्वामींच्या आई वडिलांनी त्यांना समर्थ चरणी अर्पण केले.
'''अन्य इतिहास :''' नाशिकजवळच्या दशपंचक गावचे सदाशिव दशपुत्रे(कुलकर्णी) आणि त्यांची पत्नी उमाबाई यांच्या पोटी झालेला उद्धव नावाचा पुत्र(जन्म : इ.स.१६२७) आईवडिलांनी रामदास स्वामींच्या स्वाधीन केला. रामदासांनी त्याला आपला शिष्य करून घेतले. हा रामदास स्वामींचा पहिला शिष्य. गोदावरीच्या पूर्वेला टाकळी गावात रामदासांचा आद्य मठ होता. समर्थ संप्रदायाची दीक्षा दिल्यानंतर त्या मठाचे अधिपत्य स्वामींनी उद्धवकडे सोपवले, आणि उद्धव हे उद्धवस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे इंदुरबोधन (मनमाड-हैदराबाद रस्त्यावरील हल्लीचे निजामाबाद) या गावी दुसरा मठ स्थापन केल्यावर, रामदास स्वामींनी तोही उद्धवस्वामींना चालवायला दिला. या दोन्ही मठांत उद्धवस्वामींच्या परंपरा सापडतात.
|