परीक्षित हा [[अर्जुन|अर्जुनाचा]] नातू व [[अभिमन्यू]] आणि [[उत्तरा]] यांचा पुत्र होता. त्याच्या जन्माआधीच [[अश्वत्थामा]]ने [[ब्रह्मास्त्र]] सोडून त्याला मारण्याचा प्रयत्नप्रयत्न केला. परंतु [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाने]] त्याला जीवन दिले. त्याच्या राज्यकाळात [[कलियुग|कलियुगाला]] सुरुवात झाली असा समज आहे. त्यानेच कलीला पाच जागा रहायला दिल्या होत्या. १)सोने २)स्त्री ३)दारू ४)जुगार ५)अभक्ष्यभक्षण या पाच जागा रहायला दिल्या होत्या. [[तक्षक]] नावाचा नाग राजा चावल्याने परीक्षिताला मरण आले. [[जनमेजय]] हा परीक्षिताचा मुलगा होता.