"जयराम शिलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३२:
'''जयराम शिलेदार''' (? - [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १९९२|१९९२]]) हे [[मराठी]] गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते होते. जयराम शिलेदारांचा विवाह [[इ.स. १९५०|१९५०]] साली गायिका-अभिनेत्री [[जयमाला शिलेदार|जयमाला]] यांच्याशी झाला. [[लता शिलेदार]] (दीप्ती भोगले) आणि [[कीर्ती शिलेदार]] या त्यांच्या कन्या होत. अभिनेता किरण भोगले हा जावई.
[[अण्णासाहेब किर्लोस्कर]] यांनी सुरू केलेल्या संगीत नाटकांना, [[बालगंधर्व]], संगीतसूर्य [[केशवराव भोसले]], मास्टर [[दीनानाथ मंगेशकर]] यांच्यामुळे सोन्याचे दिवस दिसले. संगीत रंगभूमीने मराठी भूमीतल्या संगीत रसिकांना झपाटून टाकले. पण बोलपटांच्या युगाने संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. महाराष्ट्रातल्या बहुतांश संगीत नाटक संस्था हळूहळू बंद पडल्या. संगीत रंगभूमीलाही ओहोटी लागली होती. जयराम शिलेदार यांना चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली होती तरी, त्यांचा जीव मात्र संगीत रंगभूमीवरच घुटमळत होता. जयमाला यांची साथ मिळताच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ वळवली आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला वाचवायसाठी पुढचे आयुष्य संगीत रंगभूमीसाठीच समर्पित केले. परिणामी त्यांनी रंगभूमीवर आणलेल्या संगीत नाटकांच्यामुळेच, संगीत रसिकांची पावले पुन्हा नाट्यगृहाकडे वळली. नव्या पिढीलाही त्यांनी संगीत नाटकांचे वेढ लावले. ते वाढवले आणि युवा पिढीनेही संगीत नाटकाची ही परंपरा पुढे चालवायसाठी
जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी ’मराठी रंगभूमी' ही संस्था स्थापन करून, संगीत नाटकांची परंपरा पुनरूज्जीवित तर केलीच, पण पुन्हा संगीत रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे दर्शनही संगीत रसिकांना घडवले.
ओळ ३८:
वि.भा. देशपांडे यांनी दीड तासात आटोपेल इतके संक्षिप्त करून दिलेल्या संगीत सौभद्र आणि संगीत रामराज्य वियोग या नाटकांचे यशस्वी प्रयोग जयराम शिलेदारांनी दिल्ली आकाशवाणीवरून सादर केले.
==जयराम शिलेदार यांच्या ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेनेसादर केलेली नाटके ==
* संगीत अनंत फंदी
* संगीत अभोगी
|