'''संताजी घोरपडे''' (मृत्यू : १८ जून, इ.स. १६९७) हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] (१६८९ ते १६९७) या काळात सरसेनापती होते. [[छत्रपती संभाजीराजे भोसले|संभाजी महाराजांच्या]] मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव [[धनाजी जाधव]] यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. [[शिवाजी|शिवाजी महाराजांनी]] स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.
संताजी घोरपडे यांच्या वडिलांनी - म्हाळोजीराव घोरपडे यांनी- [[कुरुंदवाड]] येथे प्रयागतीर्थ म्हणून ओळखले जाणार्या [[पंचगंगा]] आणि [[कृष्णा नदी]]च्या संगमावर एक सुब्रह्मणेश्वर महादेवाचे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. [[कुरुंदवाड]] संस्थानाधिपती श्रीमंत रघुनाथ दादासाहेब पटवर्धन यांनी मंदिराशेजारी नदीवर १७९५ साली एक घाट बांधला आहे. .