"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
विस्तार, दुरुस्ती व दुवे जोडले ~~~~
ओळ ३०:
साने गुरुजींचा जन्म कोकणातील [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[पालगड]] या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
 
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी [[अमळनेर]] येथील [[प्रताप हायस्कूल]] येथे [[शिक्षक]] म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, [[सेवावृत्ती]] शिकवली. अंमळनेर येथील [[तत्त्वज्ञानप्रताप मंदिर|तत्त्वज्ञान मंदिरातकेंद्र]] येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
 
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर [[महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या]] विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून [[सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत]] भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, [[जळगाव]] जिल्ह्यातील [[फैजपूर]] येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत [[भूमिगत]] राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
ओळ १६६:
* साने गुरुजी साहित्य संकलन. लेखक प्रेम सिंह
* सेनानी साने गुरुजी. लेखक राजा मंगळवेढेकर
 
 
 
{{विकिस्रोत साहित्यिक}}