"शहाजीराजे भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पूणे ला पुणे केला, replaced: पूणे → पुणे using AWB
ओळ २३:
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[व्यंकोजी भोसले]] तंजावुर <br> [[छत्रपती शिवाजीराजे भोसले]] पूणेपुणे
| वडील = [[मालोजीराजे भोसले]]
| आई = उमाबाई
| पत्नी = [[जिजाबाई]]
| संतती = [[संभाजीराजे भोसले (थोरले)]], </br />[[छत्रपती शिवाजीराजे भोसले]],<br>[[व्यंकोजी भोसले]],<br>कोयाजी,<br> सन्ताजी
| राजवंश = भोसले
| राजगीत =
ओळ ४०:
मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई(उमाबाई)हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भासले यांची मुख्य राणी उम्मवा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत.<ref>शिवराज्य, लेखक.इतिहास संशोधक [[मा.म.देशमुख]] पृष्ठ २३</ref>
==पार्श्वभूमी==
[[राजस्थान]]च्या [[चित्तोडगढ]]च्या संग्रामात [[अल्लाउद्दीन खिलजी]]शी लढताना [[राणा लक्ष्मणसिंह]] नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित [[बाबाजीराजे भोसले]] यांच्या घरात [[मालोजीराजे भोसले]] आणि [[उमाबाई भोसले]] यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील [[लखुजीराव जाधव]] यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर [[इ.स. १६०५ ]] मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
==अहमदनगरच्या निजामशाहीत==
[[मालोजीराजे भोसले]] आपला भाऊ [[विठोजीराजे भोसले]] इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहजींचे पिता मालोजीराजे यांनी लाखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स. १५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली.
 
==भातवडीचे युद्ध ==
ओळ ५८:
== हिंदवी स्वराज्य ==
 
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर [[श्यामराज रांझेकर]], [[बाळकृष्णपंत हणमंते]], [[रघुनाथ बल्लाळ अत्रे]], [[कान्होजी जेधे नाईक]] व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.
 
शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस आहे या संशयाने आदिलशाहीने, मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने [[बाजी घोरपडे]], [[मंबाजी भोसले]], [[बाजी पवार]], [[बाळाजी हैबतराव]], [[फतहखान]], [[आझमखान]] यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, [[इ.स. १६४८]] चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, [[इ.स. १६४९]] रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
 
तसेच जेव्हा अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा, अफझलखानाची दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७,००० फौज बिजापुर बाहेर खडी ठेवली होती.
 
शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत [[आदिलशाही]],[[मुघल साम्राज्य|मुघलशाही]] व [[निजामशाही]] - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
ओळ ७२:
*[[इ.स. १६३६]] ते [[इ.स. १६६४]] - [[आदिलशाही]]
 
पुढे [[इ.स. १६६१]]-[[इ.स. १६६२]] दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,[[इ.स. १६६४]] रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे बांधली.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3129505.cms? काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत] </ref>
 
=वारसा=
शहाजीराजे आपल्या कारकिर्दित निझाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले तरी त्यान्ची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यानी तसा दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. त्यान्चे स्वप्न त्यांचे पुत्र [[शिवाजी]] (महाराष्ट्र) [[व्यंकोजी_भोसलेव्यंकोजी भोसले|एकोजी]] (तन्जावर) यानी प्रत्यक्षात आणले.
 
=संदर्भ=
ओळ ८३:
 
{{मराठा साम्राज्य}}
 
 
 
 
 
 
 
[[वर्ग:भोसले घराणे]]