हिमसागर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक आठवड्य्तूनआठवड्यातून एक दिवस धावणारी आगगाडी आहे. ही आगगाडी भारताच्या तामिळनाडू राज्याच्या अगदी दक्षिण टोकाच्या कन्याकुमारी पासून ते भारताच्या उत्तर टोकाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या वैष्णोदेवी येथील कत्रा शहरापर्यंत धावते. सध्या ही अंतर आणि वेळ या बाबतीत दुसर्या क्रमांकाची ट्रेन आहे. या बाबतीत हिने दिब्रूगड- कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ट्रेनलाही मागे टाकले आहे. ही ट्रेन ७२ तासात ३७९० कि.मी.प्रवास सरासरी ताशी ५२ कि.मी. वेगाने पूर्ण करते. ही ट्रेन देशाच्या १२ राज्यांतून धावताना ७३ स्थानकांवर थांबते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://m.indiarailinfo.com/train/630/10091/1010?kkk=1442046032030|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस १६,३१८|प्रकाशक=रेलइनक्वायरी.इन |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>