"राजवाडे संशोधन मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
भारत इतिहास संशोधन मंडळातील पदाधिकार्‍यांशी मतभेद झाल्यानंतर इतिहासाचार्य वि.का. [[राजवाडे]] यांनी पुणे सोडून धुळे गाठले. तेथील आपल्या सव्वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी इतिहास संशोधनाचे काम केले. या कार्यकाळात त्यांनी इतिहास आणि संपूर्ण साहित्य विश्वाला दिशा देणार्‍या ग्रंथांची निर्मिती केली.
 
३१1३१ डिसेंबर १९२६ रोजी इतिहासाचार्य [[राजवाडे]] यांचे निधन झाले. त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेले काम अखंडितपणे सुरू राहावे म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलावलेल्या सभेतच म्हणजे [[९ जानेवारी]], [[इ.स. १९२७]] रोजी, त्यांच्या अनुयायांनी इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली आणि [[राजवाडे]] यांनी जमविलेले ऐतिहासिक दस्तऐवज, ग्रंथसंपदा जतन करून ते संशोधन व संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले.
 
==राजवाडे संशोधन मंडळाचे ग्रंथालय==
९ जानेवारी १९२७ रोजी या ग्रंथालयाची स्थापना झाली. संशोधकांसोबत अभ्यासकांना या ग्रंथालयाचा उपयोग व्हावा हाच यामागे हेतू होता. सुरुवातीला अगदी दोन-अडीच हजार ग्रंथसंपदा असलेल्या या ग्रंथालयातली ग्रंथसंख्या हळूहळू २५ हजारांवर गेली. ७५० पेक्षा अधिक सभासद नियमित ग्रंथालयाचा लाभ घेतात.
 
==दुर्मीळ ग्रंथ==
ग्रंथालय पुरातन असल्याने त्यात दुर्मिळ अमूल्य असे ग्रंथ जतन करून ठेवले आहेत. संशोधनाच्या निमित्ताने येणार्‍या देश-विदेशातील अभ्यासकांना या ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचा अभ्यास करायला मिळतो.
 
या दुर्मीळ ग्रंथांसोबतच येथे कथा, कादंब-या, ललित, चरित्र, धार्मिक,ज्योतिष, पर्यावरण, संदर्भ, शिक्षण अशा नानाविध ग्रंथांचे संग्रह केले आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच संस्कृत भाषेतील ग्रंथही उपलब्ध आहेत. या ग्रंथालयात राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाकडून मिळालेल्या अनेक ग्रंथांचा समावेश आहे. दानशूर व्यक्तींकडूम मिळालेल्या ग्रंथांमुळेही हे ग्रंथालय समृद्ध झाले आहे.