"दंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
दंडीच्या नावावर जरी किमान तीन ग्रंथ असले, तरी त्यापैकी काव्यदर्श (किंवा काव्यादर्श) व दशकुमारचरित हे दोन ग्रंथ त्याचेच आहेत असे निश्चितपणे सांगता येते. काव्यादर्श हा ग्रंथ काव्यचर्चेच्या काळातील स्वतंत्र ग्रंथ आहे. त्यामुळे तो संस्कृत साहित्यशास्त्राच्या परंपरेत मान्यता पावलेला ग्रंथ आहे. विद्वानांनीही या ग्रंथाचा खूप आदर केला आहे. महाकाव्याचे चिंतन आणि समीक्षण करणारा हा ग्रंथ प्रमाणभूत म्हणून मानण्यात येतो. या ग्रंथाची श्लोकसंख्या ३६० असून, त्याचे तीन परिच्छेद आहेत. पहिल्या परिच्छेदात महाकाव्याची व्याख्या केली आहे; तसेच महाकाव्याचे तीन विभागही सांगितले आहेत.
काव्यदर्श या पद्यरूपातील ग्रंथात दंडीची सूक्ष्म बुद्धी, कल्पकता आणि तर्कशुद्ध विचारपद्धती दृष्टीस पडते. त्यावरूनच दंडी हा संस्कृत कवी आणि काव्यशास्त्रज्ञ म्हणून गौरविला गेला आहे. दंडीने
दंडीच्या मते गद्य, पद्य आणि मिश्र असे काव्याचे तीन विभाग आहेत, तर आख्यायिका आणि कथा असे महाकाव्याचे दोन प्रकार आहेत. महाकाव्याबरोबरच दंडीचे वाङ्मय प्रकाराचेही भेद वर्णिले आहेत. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मिश्र असे वाङ्मयाचे चार भाग
'त्रयो दण्डिप्रबन्धाश्च' यासारख्या वचनांमधून दंडीने तीन ग्रंथ लिहिले आहेत, असे सांगितले जाते. परंतु काव्यदर्श आणि दशकुमारचरित याशिवाय वरील संदर्भानुसार नेमका तिसरा कोणता ग्रंथ दंडीचा हे सांगता येणे अवघड आहे. त्याने आपल्या ग्रंथांत महाराष्ट्रीय प्राकृताची स्तुती केली आहे. वैदर्भी रीतीला श्रेष्ठ मानले आहे. आपल्या काव्यात त्याने आंध्र, चोळ, कलिंग व विदर्भ या दक्षिणेतील देशांचे विपुल वर्णन केले आहे. त्याच्या काव्यात कावेरी नदीचा व दक्षिणी चालीरीतीचा वारंवार उल्लेख येतो. यावरून विद्वानांनी असा निष्कर्ष काढला आहे, की दंडी हा दाक्षिणात्य कवी होता.
|