"केसरी (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 117.223.27.44 (चर्चा) यांनी केलेले बदल 199.190.45.11 यांच्या आवृत्तीकडे पूर्व...
ओळ ४३:
===स्वतंत्र्य लढ्यातील योगदान===
{{विकिकरण}}
त्या काभारतीयभारतीय स्वातंत्र्यलढ्यात टिळक व गांधी या दोन्ही पर्वात आणि त्यानंतरच्या कालखंडात संयुक्त महाराष्टाच्या चळवळीत, राज्यातील जी वैचारिक वर्तमानपत्रे समाज जागृतीच्या कार्यात अग्रेसर होती, त्यात 'केसरी' वृत्तपत्रास जनमानसाने सातत्याने प्रातिनिधिकरीत्या वैशिष्ट्यपूर्ण स्थान दिले, ही या वृत्तपत्राची खासीयत आहे. 'केसरी'ने राज्यातील जनतेच्या विविध प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचे कामही केले आहे.
'केसरी'वृत्तपत्राने वर उल्लेखिल्याप्रमाणे लखंडातत्या कालखंडात जे महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यास तोड नाही. 'केसरी', 'ज्ञानप्रकाश' व 'नवा काळ' ही वृत्तपत्रे साधारणतः तालुका वजा शहरात येत असत; परंतु दळणवळणांच्या सीमित सोयीमुळे त्या काळच्या मुंबई राज्यात सर्वच ठिकाणी वृत्तपत्रे उपलब्ध नसत. त्या काळात हल्ली इतके वर्तमानपत्र वाचावयास मिळणे हे सहज सुलभ नव्हते. ठरावीक व्यक्तींकडेच व वर्तमानपत्रांच्या दुकानांतही मोजक्याच प्रती असत. राजकीय संक्रमणाचा कालखंड असल्यामुळे उपलब्ध वर्तमानपत्रांवर वाचकांची गर्दी होत असे.
 
'केसरी'च्या वृत्तपत्रीय कार्याचा आजपर्यंतच्या १३० वर्षांच्या या प्रदीर्घ काळातील वाटचालीचे अवलोकन करता इतिहासाचा अधिक धांडोळा घेणे मला क्रमप्राप्त वाटते. यातील जवळ जवळ ८० वर्षांच्या कालावधीत प्राधान्याने स्वातंत्र्यप्राप्ती व त्यानंतरचे मुंबईसह संयुक्त महाराष्टाची चळवळ या वातावरणात 'केसरी'चा काळ व्यतीत झाला आहे.