"नरसिंह चिंतामण केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नरसिंह चिंतामण केळकर''' ऊर्फ तात्यासाहेब केळकर (जन्म : मोडनिंब, [[२४ ऑगस्ट]], [[इ.स. १८७२]] - [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९४७]]) हे [[मराठी]] पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्‍या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जाते.<ref>{{cite web | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-quality-and-low-quality-chickens-180818/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: २४ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=२४ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref>
 
==शिक्षण==
तात्यासाहेबांचे घराणे [[रत्‍नागिरी]]जवळच्या ढोकमळे गावचे. त्यांचे वडील [[मिरज]] संस्थानात कारकून, फौजदार,मामलेदार अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. ते मोडनिंबला असताना न.चिं. केळकरांचा जन्म झाला. तात्यासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मिरजेच्या सरकारी शाळेत व माध्यमिक शिख्षण पुण्याच्या सरकारी शाळेत झाले. इ.स. १८८७साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन, कोल्हापूरच्या राजाराम आणि नंतर पुण्याच्याच डेक्कन कॉलेजातून घेतले. डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला.
 
==राजकीय कारकीर्द==
मुन्सिफाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते [[लोकमान्य टिळक]] यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर १८९७सालापासून संपादक झाले. १९३५ ते १९४७ या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला.
 
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे केळकरांच्या हातात्त आली. १९१८मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९२५ साली मध्य भागातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदेमंदळाचे सदस्य झाले. केसरी मराठा संस्थेचे ते विश्वस्त होते. [[लंडन]]मध्ये भरलेल्या दुसर्‍या गोलमेज परिषदेचे ते भारताचे प्रतिनिधी होते.
 
==सन्मान==
* केळकर इ.स. १९२१मध्ये [[बडोदे]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते.
* ते इ.स. १९०६मध्ये [[नाशिक]] येथे भरलेल्या २र्‍या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संंमेलनाचे]] अध्यक्ष होते.
 
==न.चिं कॆळकरांनी लिहिलेली पुस्तके==
* अमात्य माधव (नाटक)
* कृष्णार्जुनयुद्ध (नाटक)
* कोकणचा पोर (कादंबरी)
* चंद्रगुण (नाटक)
* तोतयाचे बंड (नाटक)
* बलिदान (कादंबरी)
* भारतीय तत्त्वज्ञान (वचारिक)
* मराठे आणि इंग्रज (ऐतिहासिक)
* लोकमान्यांचे चरित्र (२ खंड) -चरित्रलेखन
* वीर विडंबन (नाटक)
* संत भानुदास (नाटक)
* सरोजिनी (नाटक)
* हास्य विनोद मीमांसा (ललित)
 
== संदर्भ आणि नोंदी ==