"समाजवादी पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''समाजवादी पक्ष''' किंवा तत्सम नाव असलेले अनेक राजकीय पक्ष भारतात आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा हा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. (बाकीचे पक्ष - कॉंग्रेस, हिंदुमहासभा, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग.) पुढे प्रजापक्ष (स्थापना इ.स.१९३०, हा पुढे प्रजा संयुक्त पक्ष झाला) नावाच्या एका समान विचारसरणी असलेल्या पक्षात सामील होऊन तो प्रजासमाजवादी पक्ष तयार झाला. याही पक्षाचे लोहिया समाजवादी, संयुक्त समाजवादी, बहुजन समाजवादी, लोकदल वगैरे नावाचे अनॆक तुकडे होऊन बरेच राजकीय पक्ष तयार झाले. आजही हिंदुस्थान प्रजापक्ष, भारतीय प्रजापक्ष ता नावाचे काही प्रजापक्ष अस्तित्वात आहेत.
जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला '''समाजवादी पक्ष''' हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. हा आजही उत्तरी [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राजकीय पक्ष]] आहे. सध्या मुलायम सिंग यादव हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. अमरसिंग, अबू आझमी हे पक्षातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती. अनेक चित्रपट अभिनेते व उद्योगपती या पक्षाचे सदस्य आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात या पक्षाचे वर्चस्व आहे. अलीकडच्या काळात मुंबईत या पक्षाने आगमन केले होते. २००८ मध्ये मराठी भाषकांच्या विरोधात या पक्षाने काही प्रक्षोभक भाषणे व भित्तिपत्रके लावल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर या पक्षाची धुमश्चक्री उडाली होती.
भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला. याही राजकीय पक्षाचे यथावकाश तुकडे होऊन (नीतीशकुमार/शरद यादव यांचा) संयुक्त जनता दल, (लालूप्रसाद यादव यांचा) राष्ट्रीय जनता दल, (ओमप्रकाश चौटाला यांचा) भारतीय राष्ट्रीय लोकदल, (देवेगौडा यांचा) जनता दल सेक्युलर आणि (कमल मोरारका यांचा) समाजवादी जनता पक्ष वगैरे वगैरे अनेक पक्ष निर्माण झालॆ. यापैकी सहा पक्षांचे विलीनीकरण होऊन एक नवा राजकीय पक्ष उदयास येत आहॆ (१५ एप्रिल २०१५ या तारखेची बातमी). पक्षाचे नाव अजून ठरलेले नाही.
रामविलास पासवान, अजित सिंग, नवीन पटनायक अशा काही नेत्यांनी या नव्या पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
|